राज्यात महायुतीचे सरकार स्थान्नापन्न आहे. मात्र या भाजपाचा मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना खुष करण्यासाठी अनेक प्रसारमाध्यमांमध्ये निनावी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यासाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसून येते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधत टीका केली. पुढे बोलताना रोहित …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, उद्योग-व्यवसायासाठी १५ लाखांचे कर्ज देणार रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील
दोन लाख रुपयांचे बिगर तारण कर्ज, रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »राज्य महोत्सवाच्या जल्लोषात गिरगाव चौपाटीवर गणरायाला निरोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक मंडळांनी निरोप दिला
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला. राज्य महोत्सवाच्या या उत्साहात गीरगाव चौपाटीवर विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, …
Read More »न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ राजभवनात छोटे खानी समारंभात घेतली पदाची शपथ
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली. शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. चंद्रशेखर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल देशातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन
सागरमालासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून देशातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून, जेएन पोर्ट टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे. भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी जेएन …
Read More »सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची विभागीय परीक्षेद्वारे संधी मर्यादीत विभागीय परिक्षेद्वारे पीएसआय होण्याची संधी
राज्याच्या पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय पद महत्त्वाचे आहे. या पदाला मोठी प्रतिष्ठाही आहे. त्यामुळे राज्यातील अनेक तरूणांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वारे सरळ सेवेने पीएसआय होण्याचे स्वप्न असते. या स्पर्धा परीक्षेद्वारे पीएसआय होण्याची संधी न मिळाल्यास पोलीस दलात शिपाई पदावर भरती होऊन विभागीय परीक्षेद्वारे पीएसआय पदावर जाण्याची महत्वांकांक्षा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ राज्य सरकार आणि आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशन संयुक्तपणे राबविणार
राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मग मागासवर्गीयांना ४२% आरक्षण देणार का? आरक्षणाच्या नावाखाली मराठा व ओबीसी समाजात भांडण लावले, फडणवीसांच्या शब्दावर किती विश्वास ठेवणार?
राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन आदेश काढला आहे. सरकार जर हैदराबाद गॅझेट लागू करणार आहे तर मग तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२% आरक्षण दिले तो तेलंगणा सरकारचा आदर्श देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्र …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका, निर्णयावर टीका करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा ब्रिटीश काळातील नोंदी हैद्राबाद गॅझेटमध्ये
मराठा समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून,या निर्णयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका नाही.न्या.शिंदे समिती आणि कायदे तज्ञाशी चर्चा करून निर्णयाच्या मjeOeसूद्याला अंतिम स्वरूप देण्यात आले.मात्र निर्णयावर टिका करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. मंत्रीमंडळाच्या उपसमीतीने …
Read More »मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्यावर टीका यापुढेही मराठा समाजासाठी काम करतच राहणार
मागील पाच दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले होते. तसेच मागील तीन-चार वेळेप्रमाणे राज्य सरकार ठोस निर्णय न घेता मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणार का अशी चर्चा सुरु होती. मात्र राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नुसत्याच ऐकून नाही घेतल्या तर …
Read More »
Marathi e-Batmya