राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, गरीब व सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणे ही काँग्रेसची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. …
Read More »मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे. वार्षिक उत्पन्न ८ लाख …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, या क्षेत्रांवर ‘मित्र’ने विशेष लक्ष… मित्रच्या संचालक मंडळाची बैठक
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच ‘मित्र’ ने कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करावे. जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि राज्याच्या विकासाला देखील मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. यावेळी महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप…भीतीपोटी योजनेवर उद्धव ठाकरेंची टीका महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना २५ लाख राख्या पाठविणार
महायुती सरकरच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते या योजनेवर टीका करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा …
Read More »मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार यांचे मोठे वक्तव्य… तर आम्ही पाठिंबा देऊ ५० टक्क्यांच्या वरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्राने हे धोरण बदललं पाहिजे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र सरकारने धोरण बदलण्याची भूमिका घेतली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. शरद पवार पुढे …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, तरुणांना नोकरी ऐवजी… भविष्य उद्धवस्त करण्याचा सरकारचा डाव आहे का? शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा?
महाभ्रष्टयुती सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले आहे, राज्यावर ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला असून कर्ज काढून कंत्राटदारांचे खिशे भरणे व त्यातून टक्केवारीची मलई खाण्याचा उद्योग सुरु आहे. सरकारकडे जनतेसाठी पैसे नाहीत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास पैसे नाहीत. पूरग्रस्तांना मदत करण्यास पैसे नाहीत, बेरोजगांसाठी पैसे नाहीत पण सरकारी योजनांच्या प्रचारासाठी मात्र …
Read More »धाराशिव येथे टेक्निकल टेक्स्टाईल पार्क प्रकल्पाच्या कामास गती द्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
धाराशिव येथील कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये तांत्रिक वस्त्र निर्मिती पार्क (टेक्निकल टेक्स्टाईल पार्क) उभारण्याच्या कारवाईस गती द्यावी. तसेच या परिसरातील डोंगराळ भागात सोलार प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. धाराशिव जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला. यावेळी आमदार राणा जगजीतसिंह पाटील …
Read More »रावसाहेब दानवे यांचा इशारा,…उद्धव ठाकरेंनी चिथावणीखोर भाषा थांबवावी विधानसभा निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना नाकारेल
दिल्ली दौ-यामधील पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागणार अशी वल्गना करत आहेत. मात्र हिंदुत्वाला तिलांजली, सरकारी योजनांमध्ये खोडा घालण्याचे प्रयत्न, २०१९ मध्ये जनादेशाचा केलेला अनादर, यामुळे उबाठा सेनेला जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी व्यक्त …
Read More »उद्धव ठाकरे म्हणाले, बांग्लादेशाने दाखवून दिलेय, कोणी स्वतःला देव समजू नये धारावीवरून अदानीला दिला इशारा
मुंबई माजी मुख्यमंत्री आणि शिवेसना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले असतानाच उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर बांग्लादेशाच्या सद्यपरिस्थितीवरून निशाणा साधला. बांग्लादेशातील सत्तापालटानंतर उद्धव ठाकरे यांचा मंगळवारपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. य दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, …
Read More »भाजपाचा हर घर तिरंगा अभियान कार्यक्रम राज्य सरकार राबविणार ९ ऑगस्टपासून राज्यात राबवित अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार
काही दिवसांपूर्वी भाजपाच्या आमदार आणि हर घर तिरंगा अभियांच्या संयोजिका उमा खापरे यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाकडून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा राबविणार असल्याचे सांगत या अभियानाची सुरुवात ९ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते. तसेच राज्यातील किमान १ कोटी नागरिकांच्या घरावर तिरंगा झेडा …
Read More »
Marathi e-Batmya