नैसर्गिक वाळूच्या अति उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी व टिकाऊ साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यात कृत्रिम वाळू (एम-सॅंड) चा उत्पादन व वापर धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणानुसार सार्वजनिक बांधकामांमध्ये या कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी …
Read More »मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिकेत प्रत्येकी एक …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाची ८ व्या वेतन आयोगाला मान्यता मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगारात सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी, १६ जानेवारी रोजी या निर्णयाची घोषणा केली. मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी, आयोग स्थापन करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. ही घटना २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अगदी आधी घडली आहे …
Read More »तीन कायद्यात सुधारणा करत वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला मंजूरी ५० टक्के राज्यांच्या मंजूरीची आवश्यकता नाही
भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी वन नेशन वन इलेक्शन ‘एक राष्ट्र, एक मतदान’ योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळाने पीटीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले. मार्चमध्ये माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने टप्प्याटप्प्याने लोकसभा …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले हे आणखी १७ महत्वाचे निर्णय तांड्याबाबत लोकसंख्येची अट शिथील, विविध समुदायासाठी महामंडळे स्थापण्याचा निर्णय
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील विविध जात आणि धार्मिक समुदायांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून निर्णय घेण्याचा सपाटा राज्य सरकारने सुरु केला आहे. आज एकूण ३३ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. त्यापैकी १७ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती खालील प्रमाणे आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …
Read More »अकृषिक कराबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिली मान्यता
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत सर्वोत मोठा निर्णय विषेष म्हणजे राज्याच्या गावठाण जमिननीवर वसलेल्या नागरिकांच्या घरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरूपी माफ करण्याचा निर्णय घेत आगामी निवडणूकीच्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसह घेतले हे महत्वाचे निर्णय गटप्रवर्तकाच्या मानधनातही केली वाढ
आज रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही नव्या मतदार वर्गाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या वास्तविक २० ऑगस्टपर्यंत कराव्यात असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला देण्यात आले होते. मात्र ह्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय राज्य …
Read More »राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार: योजनेचा विस्तार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० राबविण्यात येत …
Read More »नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका कधी ?
राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येतील. राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२१-२२ मध्ये झाल्या असून त्याचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. …
Read More »लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या भीतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ३३ मोठे निर्णय
लोकसभेचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता कधीही जाहिर होऊ शकते या भितीने राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विभाग आणि राज्यातील जनतेच्या दृष्टीकोनातून काही महत्वाचे निर्णय घेतले. तर राज्य सरकारकडून …
Read More »
Marathi e-Batmya