Tag Archives: महाराष्ट्रवादी काँग्रेस

अतुल लोंढे यांची टीका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवार यांची धमकी धमकी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते …

Read More »

सुनिल तटकरे यांचा दावा, लाडकी बहीण योजना अजितदादांनी आणल्यानेच महायुतीला २३८ जागा विधानसभा निवडणुकीत मिळालेली आकडेवारी न पहाता आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे - सुनेत्रा पवार

लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप विरोधक करत आहेत. महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप करण्यात आला पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे असा टोला लगावतानाच अजितदादांनी ही योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या याची आठवण राष्ट्रवादी …

Read More »

नवाब मलिक यांच्याकडे आता राष्ट्रवादीच्या मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपद अजित पवार आणि सुनिल तटकरे यांनी सोपवली मोठी जबाबदारी...

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय …

Read More »

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून, प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता

उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्यसरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड राज्याचे सचिव (वित्त) दिलीप जवळकर,पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत …

Read More »

दत्तात्रय भरणे यांनी स्विकारला कृषीमंत्री पदाचा पदभार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कृषीमंत्री भरणे यांनी मंत्रालयातून कामकाजास सुरवात केली, त्यावेळी ते बोलत होते. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असून शेती व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाच माझा प्राधान्याचा विषय असेल. …

Read More »

अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे …

Read More »

अजित पवार हिंजवडीच्या सरपंचाला म्हणाले, आयटी पार्क चालले पुण्यातून…सगळं वाटुळं झालं सरपंच गणेश जांभुळकरांना सुनावत ते काम झालंच पाहिजे असा दमही दिला

पुणे शहराचा विकास करताना शरद पवार यांनी जाणिवपूर्वक आयटी पार्कला पुण्यापासून हाकेच्या अंतरावर हिंजवडी परिसरात जागा देत पुणे शहराला आयटी हब मध्ये परावर्तित केले. परंतु हिंजवडीबरोबर आजूबाजूच्या भागात शहरीकरण आणि लोकवस्ती वाढली. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील कामे मार्गी …

Read More »

वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्ट इशारा… मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, कोकाटे यांच्यासोबत समोरासमोर चर्चा करणार मग निर्णय घेणार

कृषी खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याच्या जागेवर नवे नाशिकचे माणिकराव कोकाटे यांना कृषी पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पद स्विकारल्यापासून काही ना काही वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘सरकार भिकारी आहे’ मंत्रीच म्हणत… हा असंवेदनशिलतेचा कळस कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का?

महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय? असा प्रश्न पडला आहे. फडणविसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर …

Read More »

माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत केली घोषणा २५ हजार कोटी रूपये गुंतवणूकीची योजना

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे वाद असे नवे समीकरण बनले असून त्यांनी शेतकऱ्यांशी निगडीत एकाद्या विषयावर भाष्य केले की, त्याचे रूपांतर लगेच वादात होते. यापार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळीही शेतकऱ्यांशी संबधित एक नवी योजनेबद्दलची माहिती दिली. त्यातच त्यांच्या सध्याच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून वाद …

Read More »