महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १,६४,८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४,२१,९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गत …
Read More »हवामान खात्याचा इशारा कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊसाची हजेरी राहणार पुढील ६ ते ७ दिवस अती मुसळधार पाऊस
हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तर २७-३० मे दरम्यान केरळमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, २९ मे पासून वायव्य भारतावर एक नवीन पश्चिमी विक्षोभाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत …
Read More »मुंबईसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळा रोडचा समावेश
अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, प्रत्येक जिल्ह्यात पोक्सो न्यायालये स्थापन करा १०० पेक्षा जास्त केसेसे प्रलंबित असलेल्या जिल्ह्यांमध्ये न्यायालये सुरु करा
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ (पोक्सो कायदा) अंतर्गत खटल्यांची सुनावणी करण्यासाठी समर्पित अधिक न्यायालये स्थापन करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले [मुलांवर बलात्काराच्या घटनांमध्ये नोंदवलेल्या संख्येत चिंताजनक वाढ]. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला एम त्रिवेदी आणि प्रसन्न बी वराळे यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण …
Read More »राज्यातील ९५% स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास होतील
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत राज्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या …
Read More »पहलगामला गेलेल्या पर्यटकांसाठी पवारांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांकडून विमान तर शिंदे हे स्वतः जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा पुढाकार
पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली …
Read More »संजय राऊत म्हणाले की, इकडे ही ठाकरे तिकडेही ठाकरे आम्ही सध्या… राज ठाकरे यांच्या आवाहनावर उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद शिवसेना उबाठाची मांडली भूमिका
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि चुलत बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी कोणतेही वाद, भांडणं किरकोळ आहेत, तसेच एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार काही कठिण नाही. फक्त प्रश्न आहे तो इच्छेचा असे वक्तव्य करत ठाकरे बंधू एकत्र येण्याचे राजकिय संकेत दिले. …
Read More »चंद्रकात पाटील म्हणाले, त्यांना सत्तेत यायचं… संजय राऊत यांचे प्रत्युत्तर अमित शाह… चंद्रकांत पाटील यांच्या चिमट्यावर संजय राऊत यांचा खोचक टोला
लोकसभा निवडणूकीत भाजपाचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीत मात्र भाजपाप्रणित महायुतीला भरघोस जागा मिळाल्या. त्यानंतर त्यानंतर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची किमान तीन ते चार वेळा विधान भवनात भेट झाली. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचीही मुख्यमंत्री …
Read More »रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त
भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी इको सिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ड सेंटर येथे आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट …
Read More »
Marathi e-Batmya