कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाईन ३, या मुंबईच्या पहिल्या पूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील ‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ या च्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे …
Read More »आयटीआय मुंबईचे नामकरण, संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनींचा शुभारंभ कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद-राज्यमंत्री जयंत चौधरी
महाराष्ट्र शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास …
Read More »भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन पारंपरिक मराठी पेहरावात मराठी दांडीयाचा आनंद घ्यायला सर्वांनी आवर्जून हजेरी लावा
भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही सलग तिस-या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा,महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ आणि सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, मिठागरांच्या जमिनी अदानीला सुपुर्द मोदानीच्या न संपणाऱ्या लोभाच्या वेदीवर भविव्याचा बळी
मुंबई आणि उपनगरातील मिठागरांच्या जमिनी अदानीला देण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढत मुंबई शहर आणि उपनगरातील मिठागरांच्या जमिनी गृहनिर्माण सह सर्व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या विषयीचे परिपत्रकही राज्य सरकारला पाठविले. जेणेकरून राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनी आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनी राज्य सरकारने निश्चित केलेल्या कंत्राटदारास …
Read More »नायर रुग्णालयातील लैंगिक प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गंभीर दखल अधिष्ठाता बदलीचे व विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. अधिष्ठातांच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. रुग्णालयातील कर्मचारी …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीच्या स्वार्थासाठी मित्रजीवी सरकारचा…. भाजपा शिंदे सरकारने अदानीचे एजेंट म्हणून काम करू नये; कोण आहे अदानी? सरकार त्याच्यासाठी पायघड्या घालते.
भाजपा युती सरकारने मुंबई अदानीला विकली असून सर्वसामान्य मुंबईकरांना विस्थापित करण्याचे पाप केले जात आहे. लाडका उद्योगपती योजनेखाली सरकार केवळ अदानीच्या स्वार्थासाठी काम करत आहे. आता हे मित्रजीवी सरकारने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बसेरा गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहत असलेल्या कुटुंबांना उध्वस्त करायला निघाले आहे पण ही तानाशाही काँग्रेस सहन करणार नाही. …
Read More »मुंबईसह उपनगरात २४ तास पावसाचा इशारा मुंबईसह महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर
मान्सूनच्या परतीचा पाऊस मुंबईसह राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात सुरु झाला आहे. काल रात्री पुणे, सोलापूर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हजेरी लावल्यानंतर आज दुपारनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, संध्याकाळी सुरु झालेला पाऊस पुढील २४ तास मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघरसह मराठवाडा, विदर्भ आणि …
Read More »अक्षय शिंदे एनकॉऊंटरप्रश्नी उच्च न्यायालयाचा सवाल, पोलिसांचा दावा स्विकारणे कठीण पोलिसांपेंक्षा ताकदवान होता मान्य करणे अशक्य
तळोजा जेल ते ठाणे दरम्यान मुंब्रा बायपास रोडवर बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एनकांऊटर प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी अक्षय शिंदे हा बलवान होता, आणि तो पोलिस अधिकाऱ्यांना तो नियंत्रित होऊ शकत नव्हता असे म्हणणे स्विकारार्ह नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे याच्या …
Read More »जुहू किनाऱ्यावर राज्यपाल राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री शिंदे यांची स्वच्छता मोहीम आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान
प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टिकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान …
Read More »
Marathi e-Batmya