Tag Archives: मुख्यमंत्री

‘सारथी’ च्या कार्यालयासह २२५ कोटींच्या विविध इमारतींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन ५०० मुले ५०० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह

नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी च्या १५६ कोटींच्या विभागीय कार्यालयासह विविध इमारती बांधण्यात येणार आहेत. या विभागीय कार्यालयासह अभ्यासिका, ५०० मुलांची व ५०० मुलींची वसतिगृह इमारत तसेच ४३ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या धनगर समाजातील १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थीनींसाठीचे वसतिगृह व …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा मत, उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल मेट्रो-३ चा शुमारंभ होणार

उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. उद्योगांना मिळणारी सुविधा, पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एका आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे …

Read More »

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. ‘अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे …

Read More »

बौद्ध भंतेजींसाठी वर्षा निवासस्थानी चिवरदान, धम्मदान व भोजनदान सोहळा जगाला युद्ध नको बुद्ध हवाय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर आज रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान व भोजनदान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

अजित पवार यांची वाचाळवीरांना तंबी, योजनेसाठी महायुतीलाच मतदान करा सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्या राहुल गांधी यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आज काँग्रेस पक्षाकडून सत्तातारी भाजपा आणि महायुतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील वाचाळवीरांना थेट तंबी दिली. तसेच आवाहन केले की, हा महाराष्ट्र फुले शाहु आंबेडकरांचा …

Read More »

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय शुभारंभ सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर निवासी डॉक्टरांकरिता आवश्यक सोयी- सुविधांसाठी निधी देणार-'चिठ्ठीमुक्त घाटी' उपक्रमाचे कौतुक

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ‘चिठ्ठीमुक्त …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मराठवाड्याची सर्वक्षेत्रात कालबद्ध प्रगती हेच ध्येय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळा उत्साहात

कृषी, दळणवळण, उद्योगविकासातून रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात केले. येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र …

Read More »

मुख्यमंत्री पदाची धुरा आता आतिशी यांच्याकडे; मुख्यमंत्री एकच अरविंद केजरीवाल केजरीवाल यांचा उत्तराधिकारी म्हणून आतिषी यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड

दिल्लीतील कथित लीकर पॉलिसी घोटाळ्याप्रकरणी ईडी आणि सीबीआयने अटक केलेल्या अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून मंत्री आतिशी यांची निवड जाहीर केली. …

Read More »

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी यासाठी निविदेतील नियमावली त्या पद्धतीने तयार करण्यात आली. तसेच पराभवाच्या छायेत असलेल्या राज्य सरकारने सत्तेच्या शेवटच्या दिवसातही अदानी कंपनीला कंत्राट मिळावे यासाठी पाठपुरावा केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी करत या कंत्राटाच्या अनुषंगाने …

Read More »