पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचे घर नाही. तुम्हाला जनतेची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे ही तुमच्या घराची स्टोरी नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्य सरकारने आता कामाला लागायला …
Read More »‘आर्टी’ मध्ये ही पुस्तके मिळणार ८५ टक्के सवलतीच्या दरात सामाजिक न्यायविभागाच्या आर्टीकडून विक्रीसाठी पुस्तके उपलब्ध
महागडी पुस्तके जर आपणाला शंभर- दीडशे रुपयात मिळाली तर आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला असून, ८५ टक्के सवलतीत ही पुस्तके आर्टीच्या कार्यालयात …
Read More »उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा, डिझेल, पेट्रोलच्या वाहनांना बंदी घालणे शक्य आहे का? सरकारला आदेश समिती स्थापन करा
मुंबईसह मुंबई महानगरप्रदेशातील (एमएमआर)वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालून फक्त इलेक्ट्रीक व सीएनजीवर आधारित वाहनांना परवानगी देणे शक्य आहे का ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सरकारला केली. तसेच, हा तोडगा व्यवहार्य आहे की नाही ? याचा अभ्यास करण्यासाठी पंधरा दिवसांत तज्ज्ञ, महापालिका आणि वाहतूक …
Read More »शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे क्रिडा विभागाकडून आवाहन
राज्य शासनाच्या क्रिडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रिडापटुंना व क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रिडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रिडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रिडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत… मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकारचा नवीन कायदा
राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारकडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा युती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष …
Read More »धाराशिवच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, १५ तारखेपर्यंत न्याय द्या नाही तर… खंडणी प्रकरणातील आरोपीलाही मकोका लावा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी याा दोघाच्या प्रकरणातील दोषींवर राज्य सरकारने १५ तारखेपर्यंत कारवाई करावी अन्यथा राज्य बंद झालंच म्हणून समजा असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. तसेच पुढे बोलताना संतोष देशमुख यांच्या ७ मारेकऱ्यांना जो मकोका कायदा लावला आहे त्यात …
Read More »राज्य सरकारचे आवाहनः एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन
एचएमपीव्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन नसून २००१ पासून प्रचलित आहेत. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश …
Read More »बीडमधल्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले जमिन अधिग्रहणाचे रक्कम दिली नसल्याप्रकरणी न्यायालयाकडून उघडणी
२००५ मध्ये ज्यांच्या जमिनी राज्याने सक्तीने संपादित केल्या होत्या त्यांना वेळेवर मोबदला न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सरकारला फटकारले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोतीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, बीड) उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी केली, ज्यामध्ये जिल्हा परिषदेला सक्तीच्या अधिग्रहणाविरुद्ध २००५ …
Read More »वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी स्थापनेचा निर्णय
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि प्रशासनाकडून घेतलेल्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर राजकिय पटलावर या प्रकरणाचे पडसाद उमटले. त्याचबरोबर बीडमधील सर्वपक्षियांनी संतोष देशमुख यांच्या मारकऱ्यांना अटक करावी म्हणून मोर्चाही काढण्यात आला. अखेर राजकिय पडसादाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील संशयतीत आरोपी वाल्मिक कराड …
Read More »सुनावणी पुढे ढकलण्याच्या मागणीवरून सरकारची न्यायालयाने केली कानउघडणी सुनावणीला विलंब केला जात आहे – उच्च न्यायालय
बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक, ठाणे पोलिसांनी दाखल केलेला खंडणी, फौजदारी कट रचल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु, सरकारच्यावतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती न केल्याने याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी सरकारकडून करण्यात आली. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. …
Read More »
Marathi e-Batmya