Tag Archives: राज्य सरकार

उच्च न्यायालयाचा सवाल, न्यायाधिकरणातील रिक्त पदं भरण्यासाठी काय केले ? राज्य सरकारला विचारणा भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील रिक्त पदे भरण्यासाठी कोणती पावले उचचली?, त्यासाठी काय प्रयत्न केले, अशी विचारणा सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. तसेच त्यासंदर्भात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले. मोटार वाहन न्यायाधिकरणाच्या दाव्यांमध्ये जलदगतीने निर्णय घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत मोटार अपघात दाव्यांच्या न्यायाधिकरणात पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. …

Read More »

अपात्र ठरणाऱ्या लाडकी बहिणीच्याबाबत सरकारकडून जारी केला हा आदेश लाडकी बहीण लाभार्थीकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही

नुकतेच राज्यातील लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या पात्रतेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्येक लाभार्थी महिलेने तीचे आधार कार्ड बँक खात्याशी संगलग्नित करावे असे सांगितले होते. तर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नियमानुसार एकाच योजनेच्या लाभ महिलांना घेता येईल असे जाहिर वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील लाडकी बहिण योजनेतील …

Read More »

नाना पटोले यांची टीका, झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करा सरकारचे बगलबच्च्यांच्या साखर कारखान्यांना १०० कोटींचे व्याज माफ पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस पैसे नाहीत

लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला …

Read More »

राज्य सरकार देणार बॉलीवूड बादशाह शाहरूख खानला ९ कोटी रूपये व्यवहारातील चूक लक्षात आल्यामुळे राज्य सरकारचा निर्णय

बॉलिवूड बादशाह शाहरुख खानला त्याच्या प्रतिष्ठित समुद्राभिमुख बंगल्या, मन्नतच्या मालकी रूपांतरण प्रीमियमची गणना करण्यात चूक झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून ₹९ कोटी परत मिळणार आहेत. हिंदुस्तान टाईम्सने प्रथम प्रकाशित केलेल्या अहवालात असे उघड झाले आहे की मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाने मालमत्तेचे भाडेपट्ट्यावरून फ्रीहोल्ड मालकीमध्ये रूपांतर करताना चुकीची गणना केल्याचे मान्य केले आहे. …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आश्वासन

मुंबई विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पद, महाविद्यालयांचा नामांकनाचा विषय, एमएमआरडीएकडून विद्यापीठ परिसरात रखडलेली विकासकामे आदी मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी मांडून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिनेट सदस्यांसोबत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, आपलचे निर्णय रद्द करण्याची वेळ सरकार का आली? महाराष्ट्राची आजची परिस्थिती अस्वस्थ करणारी

पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचे घर नाही. तुम्हाला जनतेची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे ही तुमच्या घराची स्टोरी नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्य सरकारने आता कामाला लागायला …

Read More »

‘आर्टी’ मध्ये ही पुस्तके मिळणार ८५ टक्के सवलतीच्या दरात सामाजिक न्यायविभागाच्या आर्टीकडून विक्रीसाठी पुस्तके उपलब्ध

महागडी पुस्तके जर आपणाला शंभर- दीडशे रुपयात मिळाली तर आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला असून, ८५ टक्के सवलतीत ही पुस्तके आर्टीच्या कार्यालयात …

Read More »

उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा, डिझेल, पेट्रोलच्या वाहनांना बंदी घालणे शक्य आहे का? सरकारला आदेश समिती स्थापन करा

मुंबईसह मुंबई महानगरप्रदेशातील (एमएमआर)वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालून फक्त इलेक्ट्रीक व सीएनजीवर आधारित वाहनांना परवानगी देणे शक्य आहे का ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सरकारला केली. तसेच, हा तोडगा व्यवहार्य आहे की नाही ? याचा अभ्यास करण्यासाठी पंधरा दिवसांत तज्ज्ञ, महापालिका आणि वाहतूक …

Read More »

शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे क्रिडा विभागाकडून आवाहन

राज्य शासनाच्या क्रिडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रिडापटुंना व क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रिडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रिडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रिडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत… मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकारचा नवीन कायदा

राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारकडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा युती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष …

Read More »