राज्यातील विधानसभा निवडणूकीत अपेक्षा जास्त बहुमत मिळवित राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची रितसर निवडही करण्यात आली. या निवडीनंतर सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या नार्वेकरांच्या अभिनंदन पर ठरावावर बोलताना सासऱ्याच्या मुद्यावरून जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजी आणि काढलेले चिमटे चांगलेच रंगल्याचे पाह्यला …
Read More »सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधत विधानसभेतील पहिल्याच भाषणातून रोहित पाटील यांची एन्ट्री पहिल्याच भाषणातून विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे लक्ष वेधून घेतले
विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच विजय मिळविलेले रोहित पाटील यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीनिमित्त सभागृहातील अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना रोहित पाटील यांनी सुरेख शब्दपेरणी करणी सत्ताधाऱ्यांबरोबर विधानसभेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या राहुल नार्वेकर यांचेही लक्ष वेधून घेतले. राहुल नार्वेकर यांच्या निवडीच्या निमित्ताने विधानसभेत मांडण्यात आलेल्या अभिनंदन …
Read More »विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस
नव्या सरकारचा अर्थात महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच निवड पुन्हा एकदा करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधकांकडील आमदारांची संख्या कमी असल्याने विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर वगळता दुसरा कोणाचाही अर्ज विधानसभेच्या सचिवाकडे आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड …
Read More »मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश
मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आज विधानसभेत आज आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी विधानसभेत …
Read More »नाना पटोले यांच्या जय भिम नगरबाबतच्या प्रश्नी विधानसभाध्यंक्षांचे आदेश जयभीम नगरमधील ६५० बेघर कुटुंबांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा
पवई भागातील जय भीम नगरमधील झोपड्या तोडल्याचा प्रश्न उपस्थित करुन नाना पटोले म्हणाले की, जयभीम नगरमधील ६५० गरिब, मागासवर्गिय कुटुंबांवर ६ जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे, आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय …
Read More »आशिष शेलार यांच्या मागणीवर विधानसभाध्यक्षांचे आदेश, जरांगे पाटीलांची एसआयटी चौकशी करा
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न रखडण्यास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आंदोलक फुटत नसल्याने आपल्यावर विष प्रय़ोग आणि एन्कांऊटर कऱण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोपही केला. तसेच त्यानंतर माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र बेचिराख होई …
Read More »शरद पवार यांचे अध्यक्षांच्या निकालावर पहिल्यांदाच भाष्य, पदाचा गैरवापर…
आमच्याकडून कोणतेही भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. बारामती मतदारसंघात वर्षीनुवर्षे लोक आम्हाला ओळखतात. त्यामुळे आम्हाला काही भावनिक आवाहन करण्याची गरज वाटत नाही. परंतु, विरोधकांची भाषण करण्याची पद्धत काहीतरी वेगळंच सुचवत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. शरद पवार म्हणाले …
Read More »राहुल नार्वेकरांचे निकाल वाचनः दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार पात्र, पण पक्ष अजित पवारांचा
डिसेंबर २०२३ च्या अखेरीस शिवसेना पक्षातील फुटीच्या दाव्यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षाला अधिकृत पक्षाची मान्यता देत शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाचा असल्याचा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हा मुळ पक्ष नसल्याचा निकाल दिला. मात्र दोन्ही गटाच्या आमदारांनी परस्पराच्या विरोधी गटातील आमदारांवर …
Read More »उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, ‘एक राष्ट्र एक विधानमंच’
विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधींना परस्पर संवादी चर्चेसाठी सकारात्मक वातावरण राखणे आणि चर्चा, संवादांना प्रोत्साहन देऊन लोकहितासाठी सकारात्मक निर्णय घेणे ही पीठासीन अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी समाजाच्या प्रति लोकप्रतिनिधींनी कटिबद्ध असणे महत्वाचे आहे. लोकशाही स्तंभांचे रक्षण करण्याची महत्वाची जबाबदारी पीठासीन अधिकारी यांची असते. लोकशाही संस्थांवरील लोकांचा विश्वास बळकट करण्यासाठी ही …
Read More »राहुल नार्वेकर यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, त्यांच्या कागपत्रांमध्ये तो मुद्दाच नाही
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाची महापत्रकार परिषदेत राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निकाल दिलेला नसल्याचा आरोप करत खोचक शब्दात टीका केली. त्यानंतर काही वेळातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि तीन क्रायटेरियानुसारच निर्णय घेतल्याचे सांगत अनिल परब …
Read More »
Marathi e-Batmya