Tag Archives: विधानसभा निवडणूक

नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताः दोन आठवड्यानंतर सुनावणी नियमित जामीन अर्जावर उच्च न्यायालयात दोन आठवड्यांनी सुनावणी

माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते नवाब मलिक सध्या अंतरिम वैद्यकीय जामीनावर बाहेर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्याने ते सध्या कोणत्याही आडकाठीविना प्रचारात व्यग्र असल्याच्या दाव्याची उच्च न्यायालयाने गुरूवारी दखल घेतली. मलिक यांनी नियमित जामीनासाठी काही महिन्यांपूर्वी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आणि गुणवत्तेच्या आधारे त्यावर निर्णय देण्याचे …

Read More »

राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारातून पंतप्रधान मोदी यांची एक्झिट मुंबईतल्या सभेत पंतप्रधान मोदीं यांची घोषणा, ही माझी शेवटची सभा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रवेश झाला. अद्याप चार-पाच दिवस विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला शिल्लक राहिलेले असतानाच भाजपा महायुतीच्या प्रचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारातून एक्झिट घेत असल्याचे जाहिर केले. मुंबईत महायुतीच्या झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे आव्हान,… शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, दूध, कापसाच्या भावावर बोला महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधींनी पुनर्जन्म घेतला तरी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करु शकत नाहीत अशी दर्पोक्ती करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत ३७० कलमाचा काय संबंध? महागाई, बेरोजागारी प्रचंड वाढली आहे, महाराष्ट्रातील शेतकरी …

Read More »

मुंबईतील निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात विधानसभा मतदारसंघात सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) आजपासून टपाली मतदानाला प्रारंभ झाला. राज्यात एका टप्प्यात येत्या २० …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नांदेडच्या बसस्थानकाला भेट महिला प्रवाशांशी साधला संवाद महागाई आणि बेरोजगारी प्रश्न महिलांकडून उपस्थित

जनतेत मिसळणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे या गोष्टी आताच्या राजकिय वर्तुळात दुरापास्त झाले आहे. त्यातच १२ वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपाच्या नेत्यांना तर आता जनतेत मिसळून त्यांच्या व्यथा, त्यांचा त्रास जाणून घेण्याचे तर आता विसरूनच गेले असताना काँग्रेस नेते तर राहुल गांधी हे मात्र संधी मिळेल तेव्हा शेतकरी असो, सर्वसामान्य नागरिक …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, भाजपाने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून बेरोजगारी वाढवली काँग्रेसने पेसा कायदा आणून आदिवासींचे हक्क अबाधित ठेवले

संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, …

Read More »

ईडीची ठाणेसह मालेगाव, नाशिक सूरतसह अन्य ठिकाणी छापेमारी, १२५ कोटींचा आरोप विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आणला होता पैसा

सध्या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बेनामी पैशाच्या वाटपावरून सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केला जात आहे. यापार्श्वभूमीवर ईडीने आज ठाणे, नवी मुंबई, मालेगाव, नाशिक, सूरत व अहमदाबादमध्ये व्यापारी आणि बनावट कंपन्याशी संबधित २४ ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली. तसेच याप्रकरणी बँक खाती आणि १२५ कोटी रूपयांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. मालेगांव येथील …

Read More »

ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय महाविकास आघाडी आणि भाजपा महायुती दोन्ही सारखेच

जर ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय असल्याचे वंचित बहुजन आघाडीने ट्विटद्वारे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात वारंवार भूमिका मांडत आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींसाठी आरक्षण कमकुवत …

Read More »

पवन खेरा यांचा आरोप, भाजपामुळे प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजारांची लूट ‘बटेंगे तो पॉकेट कटेंगे’ और ‘भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे’!

भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून ५०० रुपये किलो तर कांदा १०० रुपया किलो झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये …

Read More »

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या नेत्यांच्या बॅगांची केली तपासणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, मल्लिकार्जून खर्गे आदी नेत्यांच्या बॅगांची तपासणी

मागील दोन दिवसांपासून शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार दौऱ्यात बॅगांची तपासणी केली. त्यामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगा तपासल्या का असा सवालही यावेळी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या पथकाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि …

Read More »