महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी …
Read More »अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे अन्य महत्वाचे निर्णय नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेज, अकोला येथील भाजी बाजार उभारणीसाठी जमिनीसह घेतले अनेक महत्वाचे निर्णय़
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली या बैठकीत नागपूर-नागभीड रेल्वे मार्गाचे ब्रॅाडगेज मार्गाच्या रुपांतरणाला चालना, अकोला महानगरपालिकेला शहर बसस्थानक, भाजी बाजार उभारण्यासाठी जमीन, वसई-विरारला महापालिकेला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आचोळे येथील जमीन, सोलापूरच्या कॉ. साने महिला गृहनिर्माण संस्थेला नोंदणी आणि मुद्रांक शुल्कात सवलत, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला सवलतीच्या दरात भूखंड आदी …
Read More »अजित पवार यांचे आदेश, रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींचे प्रश्न मार्गी लावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक …
Read More »प्रस्तावाचा पत्ता नाही आणि मंत्री म्हणतो, फाईल पाठविली, निधी का देत नाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयएएस अधिकाऱ्याला बोलावून विचारणा
राज्यातील महायुती सरकारकडून एकापेक्षा एक घोषणा केल्या जात आहेत. जसे काही राज्याच्या तिजोरीत पैशांचा ढिगारा लागला आहे. खर्च करायला योजना नाही अशा थाटात राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. तसेच मागील काही दिवसात राज्यात मान्सूनच्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्व जनतेला गारठून टाकलं आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यास राज्य …
Read More »सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, आमचे नेते फडणवीस आणि अजित पवार मुंडेंबाबत निर्णय घेतील धनंजय मुंडे यांच्या विनंतीचे अर्थ वेगवेगळे निघतात
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यास अटक करण्यात आली. तसेच या अटकेनंतर देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून धनंजय मुंडे हे सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या घडामोडीत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी …
Read More »भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा आरोप, महायुती सरकारने केला आश्वासनाचा भंग अल्पसंख्याक समाजाच्या संस्थाना सरकार सापत्न वागणूक देतेय
राज्य उर्दू साहित्य अकादमी यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत असून सुवर्ण महोत्सवी वर्षात फक्त १ कोटी २० लाख इतक्या अत्यल्प निधीवर बोळवण करत महायुती सरकारने वचनभंग केला. राज्य सरकार अल्पसंख्याक समाजाच्या संस्थांना जाणिवपूर्वक भेदभावाची वागणूक देत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केला. तसेच उर्दू …
Read More »एकनाथ शिंदे यांचे मत, ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान वर्षभर सुरू राहावे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत म्हणजेच पंधरवडापुरतेच मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे ८ निर्णय विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता वाढविण्यापासून ते रिअॅलिटी धोरण २०२५ धोरणास मंजूरी
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या बैठकीत राज्याच्या आगामी धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ ला मंजुरी, महानिर्मिती-सतलज जलविद्युत निगमची संयुक्त कंपनी स्थापन होणार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ, आधुनिक …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजेनको – ‘एनएमआरडीए’मध्ये सामंजस्य करार कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्प
नागपूर महानगर क्षेत्रातील कोराडी (ता.कामठी) या ठिकाणी पर्यावरणीय पर्यटन स्थळ (ईको टुरिझम) विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजनको) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड या …
Read More »
Marathi e-Batmya