Tag Archives: bjp

मनोज जरांगे पाटील गंभीर आरोप करत म्हणाले, माझा बळी हवाय, मग सागर…

राज्यातील मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीनुसार राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला स्वतंत्र ईडब्लूएस अर्थात अल्प उत्पन्न गटाखालील प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याचा ठराव एकमताने पारित केला. तत्पूर्वी सगेसोयऱ्यांनाही आऱक्षणाचा लाभ देण्याविषयीचा स्वतंत्र दुरूस्तीची अधिसूचनाही पारित केली. त्यानंतरही अंतारावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन…

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, १५ लाख रुपये, महागाई कमी करणार व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार यासारख्या अनेक गॅरंटी मोदींनी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना …

Read More »

नव्या संसदेत मंजूर झालेला नवा भारतीय दंडसंहिता कायदा १ जुलै पासून

काही महिन्यांपूर्वी देशातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी लागू असलेले ब्रिटीश काळातील कायदे रद्द करून त्याठिकाणी पूर्णतः भारतीय कायदे लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लागू केली होती. तसेच हे कायदे लागू करण्यासाठी नव्या वर्षाच्या अर्थाच्या २०२४ पहिल्या महिन्यापासून लागू होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहन …

Read More »

राज ठाकरे यांची टीका, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचय म्हणून वाटेल ते…

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांकडून पक्षसंघटना मजबूतीसाठी त्यांच्या पक्षवाढीसाठीच राजकिय पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपासह शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. प्रसारमाध्यमांशी संवाद …

Read More »

आदित्य ठाकरे यांचे उद्विग्न उद्गार ,… आणि भ्रष्टाचार पाहून मी थक्क झालो

मुंबईतील कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांनी खटला दाखल करून घेत मुंबई महापालिका आणि शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लोकायुक्त कार्यालयाने नोटीस बजावली होती. त्यानुसार आदित्य ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे ही हजर होते. यावेळी लोकायुक्तांनी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजीची तारीख ठेवली आहे. पहिली सुनावणी झाल्यानंतर आदित्य …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मविआत जागा वाटपावरून मतभेद ?, भाजपाला सत्तेतून हद्दपार…

जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद वा गोंधळ नसून गोंधळ हा महायुतीत आहे, त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. मविआतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरु असून बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत, लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. भाजपाला सत्तेतून हद्दपार करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे आणि आम्ही महायुतीचा मोठा पराभव करु, …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम सुरुय…

सध्या कोल्हापूर आणि पुणे दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार याच्या गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन आणि प्रसारमाध्यमात दाखविण्यात येणाऱ्या बातम्यांच्या प्रश्नीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर खोचक टीका केली. कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी केले उद्घाटन मुंबईतल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे होते. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच शासन काम करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कुर्ला पश्चिम येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, … सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का?

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण

राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बोलविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात शिक्षण व नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे एकाच गावात नांदणारे मराठा व ओबीसी बांधव यापुढेही गुण्यागोविंदाने नांदतील व …

Read More »