काँग्रेसच्या नेत्यांकडून एकाबाजूला यात्रा काढण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस पक्षातील नेते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमच्यासोबत येत आहेत. मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश हा तर एक ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. मिलिंद देवरा यांना बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात …
Read More »शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, तर ही घराणेशाही कशी ?
देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नव्हत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील मात्र त्याकडे कुठलेही लक्ष देण्यात आले नाही. देशातील प्रत्येक शेतकरी सध्या संकटात आहे. मात्र तरीदेखील केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसंदर्भात कुठलेही ठोस निर्णय घेण्यात येत नाही असा आरोप …
Read More »आशिष शेलार यांचा पलटवार, उद्धव ठाकरे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त उबाठाने आदित्य ठाकरे यांना लोकसभेला उतरवून निवडून आणून दाखवावे
कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत अशी खरमरी टीका करीत तुम्ही आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवा असे थेट आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटाला प्रत्युत्तर देताना दिले. उद्धव ठाकरे …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल,… योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे तरी योगदान काय?
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पर्ण झालेले नसतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यांनीही अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले आहे परंतु भाजपाचे लोक शंकराचार्यांवरच तोंडसुख घेऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यात एक …
Read More »रोहित पवार यांचा सवाल, विद्यार्थ्यांसाठी पैसा नाही, पण मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी लाखो…
यु एस मध्ये गेल्यानंतर प्रेसिडेन्शियल सुट जिथे यूएसचे प्रेसिडेंट किंवा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतात अशा काही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्ही राहिलेत का ? तिथे तुम्हाला सोन्याचा चमचा आणि ताट यामध्ये जेवण वाढण्यात आले होते का ? आणि तो सोन्याचा चमचा परत भारतात घेऊन यायला तुम्हाला परवानगी दिली होती का …
Read More »मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर, घराणेशाहीवर घरदांज माणसाने…
एकदिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काळाराम मंदिरात विधीवत पुजा केली. तसेच नाशिक येथील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्धाटन करत देशातील राजकिय घराणेशाहीवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवयुवकांनी जास्तीत जास्त राजकारणात यावे असे आवाहन तरूणाईला केले. त्यावर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत …
Read More »रामाच्या पूजेसाठी उद्धव ठाकरे यांचे थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण
एकाबाजूला भारत विकासाच्या वाटेने चालल्याचे वक्तव्य करत सांसदीय कारभारातही हिंदूत्ववादी विचारसरणीला आणि प्रथांना प्राधान्य देत केवळ स्वतःच्या नावाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच दिल्लीतील नवे संसद भवन असेल, शहिद स्मारक किंवा राजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण करण्याचा कार्यक्रम असेल अशा …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मोदी हे करणार असतील तर देशाची…
मोदी तुमच्या श्रीमंत मित्रांना अजून श्रीमंत करणं, मातृभूमीच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, खाजगी कंपन्यांची कार्यालये आणि गुंतवणुकी विविध देशात असतात. सुरक्षा संशोधन आणि DRDO …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, … भाजपाचे राजकारण धर्माच्या आधारावर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी अध्यात्माचे कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका अशी शिकवण होती पण आज भाजपाच्या राज्यात शेतकरी दररोज मरत आहे आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणेघेणे नाही. अनेक पक्षांची सरकारे आली व गेली पण …
Read More »
Marathi e-Batmya