Tag Archives: cm uddhav thackeray

या विभागातील पदोन्नतीची साखळी सुधारणार अधिनियम दुरूस्तीचे विधेयक सादर करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळीत समतोल आणण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, 1950 मधील कलम ५ पोट – कलम (2अ) मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिनियमातील दुरुस्तीबाबतचे विधेयक विधानमंडळास सादर करण्यात येईल. यापूर्वी सेवा प्रवेश नियम करत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या …

Read More »

शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांना वाढीव खर्चासह ६ महिन्याची मुदतवाढ ५० टक्के सुरक्षा रक्कम परत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोव्हिडची महामारी ही नैसर्गिक आपत्ती गृहीत धरून शासकीय कंत्राटदारांच्या अडचणींवर उपाय करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या उपाययोजनांमुळे कंत्राटदारांकडे रोकड सुलभता येवून विकास कामांची गती मंदावणार नाही. केंद्र शासनाच्या गृह विभागाने तसेच राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी करुन लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांची  गती …

Read More »

राज्याचा निकाल ९५.३० टक्के तर मुलींच्या निकालात ३ टक्क्यांनी वाढ कोकणाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबादचा निकाल सर्वात कमी

मुंबई: प्रतिनिझी यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल ९५.३० टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. “करोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली, म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

राष्ट्रीय अध्यक्षांचा स्वबळाचा नारा तर प्रदेशाध्यक्ष पाटलांचे सेनेबरोबर युतीचे वक्तव्य २४ तासातच भाजपाच्या युटर्नने राजकीय वर्तुळात खळबळ !

मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांना स्वबळाचा संदेश देवून २४ तास झाले नाहीत, तोच प्रदेश भाजपमध्ये  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सरकार बनविण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधून …

Read More »

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे तारीख पे ताऱीख ७ सप्टेंबरचा आता तिसऱ्यांदा मुहुर्त

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर दाटलेल्या कोरोनाच्या दाट छायेतून सुटका होताना दिसत नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजीत कार्यक्रमानुसार जून महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन बदलत्या परिस्थितीनुसार जुलैमध्ये होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे या अधिवेशनाला जुलै नंतर ऑगस्टच्या मुहूर्ताची प्रतिक्षा होती ती देखील आता मावळली …

Read More »

खुषखबर : लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे राहिलेले थकित वेतन मिळणार जुलै महिन्याचे वेतन अदा झाल्यानंतर मार्चचे अर्धे वेतन जमा होणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील निवडूण आलेले लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यातील अर्धे राहिलेले वेतन लवकरच मिळणार आहे. सध्या जुलै महिन्याचे वेतन तयार करण्याचे काम सुरु आहे. ते वेतन कोषागारातून दिले गेल्यानंतर लगेच मार्च महिन्याचे थकित अर्धेवेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश वित्त विभागाने सर्व विभागांना दिले असून याबाबतचा …

Read More »

गृहनिर्माणशी फटकून वागणाऱ्या अधिकाऱ्याची त्याच विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती पाच महत्वाच्या सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी शहरातील महत्वाच्या धारावी पुर्नवसन प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क ठेवत फाईल प्रक्रियेतून गृहनिर्माण विभागाला वगळणारे सनदी अधिकारी ई.व्ही. श्रीनिवास यांची नियुक्ती गृहनिर्माण विभागाचे पूर्णवेळ सचिव म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आग्रहामुळे राज्य सरकारने आज नियुक्ती केली. विशेष म्हणजे …

Read More »

मराठा आरक्षणाची सुनावणी आता ऑनलाईन नव्हे तर प्रत्यक्ष होण्याची शक्यता आजची सुनावणी समाधानकारक पण पुढील सुनावणी २५ ऑगस्टला : अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या ऑनलाईन सुनावणीवेळी पुरावे आणि इतर कागदपत्रे सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सुनावणी ऑनलाईन घेण्याऐवजी ती प्रत्यक्षात घ्यावी, हे प्रकरण सैविधानिक खंडपीठाकडे पाठविण्याची मागणी राज्य सरकारने सर्वेाच्च न्यायालयाकडे केली. यावर आता ऑनलाईन पध्दतीऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याबाबत न्यायालयाने विचार करणार असल्याचे स्पष्ट करत पुढील …

Read More »

महास्वयंम आणि ऑनलाईन मेळाव्यातून १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार १ लाख ७२ हजार बेरोजगारांची नोंदणी : कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी …

Read More »

उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

पुणे: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे. त्यावर उद्धवजी तुम्ही खुदा बनू नका,अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली असून ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते कोरोनाने …

Read More »