Tag Archives: congress

नाना पटोले यांचा सवाल, मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री कुठे आहेत ? मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने मदत पाठवा

मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व पुल वाहून गेल्याने मराठवाड्यातील अनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेल्याने खरीप हंगामही वाया गेला. शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सरकारने इव्हेंटबाजी व जाहिरातबाजी बाजूला ठेवून …

Read More »

महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती लागली कामाला नेत्यांना टार्गेट करून वातावरण बदलण्याचा प्रयत्न

बदलापूर येथील दोन चिमुरडींवरील अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपा-शिवसेना शिंदे गटाकडून करण्याचे प्रकरण ताजे असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडण्याची घडली. या दोन्ही घटनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे योग्यरितीने हाताळू शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा,… पंडित नेहरूंच्या नावाने फेक नेरेटिव्ह पसरवू नका पवन खेरा यांची टीका, जे काम मुघल करु शकले नाहीत ते भाजपाच्या बेईमान लोकांनी केले

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपाने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने विरोध केला, परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजपा पसरवत आहे, फेक …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, त्या कृत्यांबद्दल काँग्रेस माफी मागणार का? शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही

मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडल्याच्या निषेधार्थ विरोधक महाविकास आघाडीच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन पुकारत भलामोठा मोर्चा काढला. या मोर्चात शिवद्रोही सरकार म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून चुकीला माफी …

Read More »

जोडे मारो आंदोलनः नाना पटोले यांची टीका, ही भाजपाची पेशवाई वृत्ती…चुकीला माफी नाही राजकोटच्या किल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जाहिरनाम्यासाठी राज्यातील जनतेशी संवाद साधणार काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचा सामाजिक संस्थांशी संवाद

काँग्रेस पक्ष जे मुद्दे जाहीरनाम्यात घेते ते मुद्दे सरकार आल्यावर पूर्ण करण्याला प्राधान्य असते. याचा अनुभव ज्या ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आले आहे तेथील जनतेने घेतला आहेत. टिळक भवन येथे जाहीरनामा समितीने राज्यातील प्रमुख सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधून जाहीरनाम्यातील जनतेच्या मुद्द्यावर चर्चा केली. हि मिटिंग जाहीरनामा समितीचे अध्यक्ष …

Read More »

नाना पटोले यांची टीका,… माफी मागून पंतप्रधानांनी चूक मान्य केली महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्या शिंदे व फडणवीसांनी सत्तेतून पायउतार व्हावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असतानाही महा भ्रष्ट भाजपा युती सरकारला लाज वाटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या ८ महिन्यातच तो पुतळा कोसळला, हा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान धुळीस मिळाला. जनतेच्या तीव्र …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची शिवाजी महाराजांची माफी मागतानाही राहुल गांधींवर टीका स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर यांच्या अवमानाचा शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची तुलना

शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून दैवतासमोर अनेकवेळा झुकले तरी आम्हाला त्याचे वावगे नाही. सिंधूदुर्गात मागील काही दिवसात जी घटना घडली. त्या घटनेबद्दल मनात खेद आहे. तसेच या घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची पायाशी डोकं ठेवत त्यांची माफी मागत असल्याचे सांगत काहीजण स्वातंत्रवीर वि दा सावरकर यांचा अवमान करतात परंतु …

Read More »

नाना पटोले यांची टीका, आंदोलकांना नजरकैद.. भाजपा सरकार मोगलाईपेक्षा वाईट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेत तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण घाईघाईने केले होते. राजकीय लाभ उठवण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केल्याने लोकांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री माफी मागत असले तरी त्याचा काही फायदा नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, …पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी जाहीर माफी मागावी पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यावेळी मविआचे निषेध आंदोलन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील भव्य पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्याच्या घटनेचे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते, पण भाजपा युती सरकारला भ्रष्टाचाराची इतकी कीड लागली आहे की त्यांनी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला …

Read More »