राज्यात दुष्काळ, अवकाळी, गारपिटीमुळे शेतकरी पिचला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करा, नुकसानग्रस्तांना किती दिवसात भरपाई मिळणार आणि तो कालावधी किती असेल, प्रतिहेक्टरी किती दर असेल असा सवाल करत पहिल्याच प्रश्नांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला आज विधानसभेत पावसाळी अधिवेशात केला. विजय वडेट्टीवार म्हणाले की, …
Read More »नाना पटोले यांची टीका, …बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल, पण नक्कल करतानाही ७००० रुपयांची कमीशनखोरी
राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे पण मुंबईतील विधिमंडळात मात्र घोषणांचा पाऊस पडला आहे. अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देणार याचा यात उल्लेख नाही. कृषी, पाटबंधारे, सामाजिक न्याय, गृहनिर्माण अशी विभागवार निधीची तरतूद नसणारा राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. ज्या …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, पुण्यात पब आणि हॉटेल मालकांकडून हफ्ता वसुली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन
पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबास पुणे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यात ४५० ओपन टेरेस हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलकडून त्या भागातील कोरेगाव, कल्याणनगर भागात …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला संविधानावरील “सर्वात मोठा हल्ला” असल्याचे सांगत आणीबाणी जाहिर करणे हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे सांगितले. संसदेतील दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या बोलत होत्या. सार्वत्रिक निवडणुकांनंतर १८ व्या लोकसभेची …
Read More »लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या ठरावावर काँग्रेसने व्यक्त केली नाराजी पत्र लिहित के सी वेणूगोपाल यांनी नाराजी व्यक्त केली
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आणीबाणीच्या विरोधात ठराव आणल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना काँग्रेसने म्हटले आहे की, राजकीय संदर्भ देणे, तेही पदभार स्वीकारण्याच्या दिवशी, “खूप धक्कादायक” आणि “संसदेच्या इतिहासातील आश्चर्य कारक” होता. “अध्यक्षांकडून असा राजकीय संदर्भ घेणे संसदेच्या इतिहासात आर्श्चयकारक आहे. नवनिर्वाचित सभापतींच्या ‘पहिल्या कर्तव्या’पैकी एक म्हणून अध्यक्षपदावरून येणारे हे आणखी …
Read More »नाना पटोले यांची टीका, महाराष्ट्र कर्जात डुबवला, २.५ लाख कोटींचे कर्ज लादले मुख्यमंत्र्यांकडील एमएमआरडीए तोट्यात कसे ?
महाभ्रष्टयुती सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला असून विकासाच्या नावाखाली कर्ज काढून भ्रष्ट मार्गाने मलिदा खाल्ला जात आहे. जागतिक बँकेसह इतर बँकांकडूनही कर्ज काढले आहे, महायुती सरकारने राज्यावर २.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे. एमएमआरडीए सारखा विभाग नफ्यात होता तोही आता तोट्यात आहे. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असतानाही घाट्यात …
Read More »लोकसभा अध्यक्ष पदी विराजमान होताच ओम बिर्लांकडून आणीबाणी विरोधात ठराव विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी
१८ व्या लोकसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी आवाजी मतदान घेण्यात आले. या आवाजी मतदानात भाजपाचे खासदार तथा माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विजय झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांच्या बाकाजवळ जात त्यांना अध्यक्ष पदाच्या …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका,… महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणं हा जनतेचा अपमान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी; वीज बील माफी द्यावी
राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली. तरी देखील संवेदना गमावलेल्या सरकारने केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक …
Read More »भाजपाला विश्वास, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार महायुती सरकारच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड) नगरपालिकेच्या काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …
Read More »अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या ओम बिर्ला यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे के सुरेश लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावरून तिढा कायम बऱ्याच वर्षानंतर पदासाठी निवडणूक
काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला लोकसभा सभागृहाचे उपाध्यक्ष पद देण्याची तयारी दर्शविली तर सत्ताधारी भाजपा प्रणित एनडीए सरकारच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारा पाठिंबा देण्याची तयारी इंडिया आघाडीने दाखविली होती. मात्र भाजपा प्रणित एनडीएने उपाध्यक्ष पद देण्यास असमर्थता दर्शविल्याने अखेर इंडिया आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी के सुरेश यांना उमेदवारी जाहिर केली. तर भाजपाकडून अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya