Tag Archives: congress

नाना पटोले यांची माहिती ‘इंडिया’च्या पाहुण्यांसाठी हे खास खाद्यपदार्थ यात… देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम; एकनाथ शिंदे फक्त चेहरा

राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारपदावरून स्पर्धा सुरु आहे. अजित पवार यांच्या दादागिरीचा अनुभव मविआ सरकारने पाहिला आहे पण सध्या त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे. राज्यातील सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा आहेत आणि खरे मुख्यमंत्री ‘सुपर सीएम’ हे …

Read More »

दीपक केसरकर यांचा सवाल,…उद्धव ठाकरे हे राहुल गांधींकडून माफी वदवून घेणार का? किती नेते बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहणार? शिदे गटाचा उबाठा गटावर घणाघात…

ही मुंबई हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे आणि दुर्दैवाने याच शहरात त्यांचा मुलगा बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना विरोध केला, त्यांच्यासमोरच लाचारी करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे माफी मागायला लावणार का ? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना ठाकरे …

Read More »

राजू शेट्टी यांची स्पष्टोक्ती, इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय…. महाविकास आघाडीने एकदा विचारायला हवं होतं

इंडिया आघाडीची बैठक उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख २८ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात काँग्रेससह राजदचे लालूप्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टलिन, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. …

Read More »

काँग्रेसचा आरोप, पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव ४५० रुपयांचा सिलेंडर ११५० रुपये करुन २०० रुपये कमी करणे ही मोदी सरकारची लुटारु वृत्ती

महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव …

Read More »

‘इंडिया’ आघाडीमुळे घाबरलेल्या मोदींची घाईघाईत ३८ पक्षांची बैठक नाना पटोले म्हणाले, ... मोदींचा पराभव करणे हाच उद्देश

देशातील हुकुमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती म्हणूनच …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, … ‘भाजपा चलो जाव’ चा नारा ‘इंडिया’त पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार, भाजपाकडेच चेहरा नाही

भाजपाच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली एक वज्रमुठ बांधलेली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता, मोदी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप,… अत्याचाराचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा भाजपाचा डाव भाजपाने देशभरात जो द्वेष पसरवला आहे त्यातूनच अहमदनगरची घटना

अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हेरगाव येथे कबुतर चोरल्याच्या संशयावरून एका दलित तरुणाला अर्धनग्न करून झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. भारतीय जनता पक्षाने राजकीय फायद्यासाठी समाजात जो द्वेष पसरवला आहे, त्यातूनच या घटना घडत आहेत. भाजपने देशाच्या सामाजिक ऐक्याला गालबोट लावले आहे अशी घणाघाती टीका …

Read More »

दलित मुलांना मारहाण प्रकरण, शासन नेमकं कोणाच्या दारी ? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा शिंदे-फडवीस-पवार यांना सवाल

शेळी कबुतरे चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित आणि एक मराठा मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आहे, गृहमंत्री सुद्धा भाजपाचे आहे. ते स्वतः दोषींवर कठोर कारवाई …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा,… मोदी सरकार व ‘येड्याच्या’ सरकारचा पर्दाफाश करु दुष्काळाने जनता हवालदिल असताना ‘महाराष्ट्र शासन’ आहे कुठे ? बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ३ सप्टेंरपासून राज्यात जनसंवाद यात्रा सुरु करत आहे. गाव, खेडे, तालुका, शहर या सर्व भागातून ही यात्रा जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील येड्याचे (EDA) सरकार जनतेची लुट करत आहे, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी उद्धवस्थ झाला आहे. कृत्रिम टंचाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. भाजपा लोकशाही …

Read More »

नाना पटोले यांचा अंदाज, अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश… शरद पवारांबद्दल काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत संभ्रम नाही

शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत, अजित पवारांनी त्यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर परत यावे असे अजित पवारांना वाटत असावे. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे, त्यामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परततील असे चित्र दिसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »