Tag Archives: congress

नाना पटोले यांचा सवाल, मविआने आरक्षणाची पायाभरणी केली आता दिरंगाई कशासाठी ? ओबीसी आरक्षणासाठी भाजपाप्रणित सरकारने तत्परता दाखवावी

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. ओबीसी आरक्षणाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे. बांठिया आयोगाचा अहवालही सादर झाला आहे परंतु भाजपाप्रणित सरकारला सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडणे जमलेले दिसत नाही. मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता दिरंगाई …

Read More »

भाजपा सरकारच्या हुकूमशाहीला काँग्रेस भीक घालत नाही सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस राजकीय सूडभावनेने !: नाना पटोले

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार मनमानी व हुकूमशाहीपद्धतीने काम करत असून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही राजकीय सूडभावनेने पाठवलेली आहे. भाजपाच्या अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत …

Read More »

काँग्रेस म्हणते, …तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात जाणार शिवसेना संपवण्याच्या राजकारणात भाजपा बंडखोरांचाही वापर करुन त्यांना सोडून देणार

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज खंडपीठाकडे सोपवला असला तरी कायदेशीरबाबींचा विचारविमर्श करता न्यायालयाचा निकाल हा सरकारच्या विरोधात जाऊ शकतो. मुळात राज्यातील भाजपा प्रणित सरकार हे असंवैधानिक असून या सरकार स्थापनेसंदर्भात आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णयही असंवैधानिकच आहेत, असे परखड मत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मांडले आहे. …

Read More »

अशोक चव्हाण यांच्याकडून रस्त्याच्या नावाखाली निधीचा गैरवापर नांदेड महापालिका निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांकडून जनतेची दिशाभूल- खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

नांदेड महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशोक चव्हाण यांनी सत्ता जाणार हे निश्चित असतानाही १५० कोटींच्या कामांना मान्यता दिल्याची घोषणा केली. अशा घोषणा करून अशोक चव्हाण हे नांदेडच्या जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपा रक्तरंजित कारवायांमध्ये सक्रीय भाजपा व अतिरेक्यांचे संबंध; राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक: डॉ. अजोय कुमार

भारतीय जनता पक्ष ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली देशातील वातावरण रक्तरंजित करत असून अनेक घातपाती कारवाया व अतिरेकी कारवायांत सापडलेले आरोपी व भाजपाचे घनिष्ठ संबंध उघड झाले आहेत. पुलवामा घटना, उदयपूरमधील कन्हैयालाची हत्या, आसाममध्ये अतिरेक्यांना टेटर फंडिग करणारा निरंजन होजाई, या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपींचे भाजपाशी संबंध उघड झाले असून भाजपाच्या ढोंगी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका राज्य सरकारने मध्यस्थी करण्याची मागणी

राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत अशी मागणी करत भाजपाप्रणीत नवीन सरकारने तात्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्यात तत्कालीन …

Read More »

नाना पटोले यांचा निशाणा, मोदी सरकारचा नवा नारा ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा मोदीजी १०५३ रुपयांचा गॅस सिलिंडर किती लोकांना परवडणार ?

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. या भाववाढीने गॅस सिलिंडर १०५० रुपये झाला आहे. एवढा महाग गॅस घेणे किती लोकांना परवडणार आहे ? असा सवाल विचारत ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ हा मोदी सरकारचा …

Read More »

नाना पटोले म्हणाले, या संकटातून देश वाचला पाहिजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी

राज्यातील शेतकऱ्यांवरील आस्मानी सुल्तानी संकटातून सुटका कर आणि त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या विठ्ठलाकडे केली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिंडीत सहभागी होत संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर येथील अकलूज येथे …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, कोणत्या कायद्याच्या आधारे अध्यक्ष पदाची निवडणूक घेणार? महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कायद्यानुसार की जून्या कायद्यानुसार

मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील सुप्त तरी कधी उघड संघर्ष सातत्याने पहायला मिळाला. तसेच काही महिन्यांपूर्वी विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने अध्यक्ष पदाच्या कायद्यात दुरूस्ती करत त्या आधारे निवडणूक प्रक्रिया जाहिर करावी अशी मागणी केली. परंतु राज्यपालांनी रिक्त अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया जाहिरच केली …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, कोणाचे हितसंबंध जोपासण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ ? आरेमध्ये कारशेड करण्याचा भाजपप्रणित सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुंबई मेट्रो कारशेड आरे मध्येच होईल असे जाहीर करून भाजपप्रणित राज्य सरकारने पहिला घाव मुंबईकरांवर घातला आहे. पर्यावरणाचा विचार करून आरे मधील कारशेड कांजूरमार्ग येथे करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु पुन्हा आरेमध्येच कारशेड करण्याचा आग्रह धरणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे, …

Read More »