मुंबईः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारला भारतीय जनता पक्ष हा अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणून हिणवत होता. अमर, अकबर, अँथनी जसा हिट चिटपट होता तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे कॉम्बिनेशन हिट झाल्याचे विधान परिषदेच्या आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव …
Read More »भाजपाच्या दोन मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघात घुसली महाविकास आघाडी फडणवीस, पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा गड झाला खिळखिळा
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांकरीता झालेल्या निवडणूकांत मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मतदारसंघातील जागा राखता आल्या नाहीत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पुणे पदवीधर मतदारसंघातील एक जागा भाजपाकडे होती. मागील काही वर्षापासून या मतदारसंघातून …
Read More »विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आगामी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात आज घेण्यात आला. यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन गरमच राहण्याची शक्यता आहे. नागपूर करारानुसार वर्षभरातील एक अधिवेशन नागपूरात घ्यावे असे बंधनकारक आहे. याकालावधीत संपूर्ण राज्याची प्रशासकिय आणि सरकार नागपूरात स्थलांतरीत होते. मात्र …
Read More »सात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. 7 जिल्हयातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. …
Read More »केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मात्र विरोधकांना धमकाविण्यासाठी ईडीचा वापर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु केंद्राने अजूनही मदत केलेली नाही. दोन महिने झाले तरी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी …
Read More »शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात आघाडीतील सहयोगी पक्षांकडून भाजपावर टीकेचा सूर
मुंबईः प्रतिनिधी आर्किटेक्चर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सातत्याने आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाडी टाकत सरनाईक यांचे सुपुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. नाईक प्रकरणात सरनाईक यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे या प्रकरणाची बंद झालेली फाईल राज्य सरकारने पुन्हा उघडली. तसेच पुढील …
Read More »महेबूबा मुफ्तींबरोबर सत्ता भोगणा-या भाजपने इतरांना देशभक्ती शिकवू नये सत्ता गेली पण भाजपची खोटारडेपणाची सवय गेली नाही!: बाळासाहेब थोरात
मुंबई : प्रतिनिधी सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच सवयीला जागून पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला …
Read More »भाजपाच्या विरोधाची वर्षपूर्ती महाराष्ट्र विरोधी राजकारण करण्यात भाजपा यशस्वी होतेय ?
देशात आणि राज्यात वारंवार काँग्रेसची सत्ता येत असताना काँग्रेसेतर पक्षांना मिळणारी मते आणि त्यांना मिळणाऱ्या निवडणूकीतील जागांमुळे असं म्हटलं जायचं कि, लोकशाहीत जर सर्व काँग्रेस विरोधी पक्ष आले तर काँग्रेस कधीच सत्तेत येणार नाही आणि विरोधकच वर्षानुवर्षे सत्तेत राहीतील. या म्हणण्यातील सत्यता महाराष्ट्रात उतरली. परंतु ती काँग्रेसबाबतीत नाही तर काँग्रेसचा …
Read More »खुशखबर: अनुसूचित जमातीमधील या विद्यार्थ्यांना मिळणार २६ हजाराचे आर्थिक सहाय्य मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात …
Read More »खोटं बोलणार्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार भाजपा आ. अतुल भातखळकर यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळातील वाढीव व चुकीच्या वीज बिलांमध्ये सवलत देणार नाही असं सांगून खोटं बोलणार्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी इशारा दिला. भाजपाने अन्यायी वीज बिलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ असे सरकारने जाहीर केले, तसा प्रस्ताव …
Read More »
Marathi e-Batmya