Tag Archives: congress

जनतेने राम मंदिर ट्रस्टलाच आपला निधी जाईल याची काळजी घ्यावी रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा! - सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवरती राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. परंतु या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएस देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असून सदर पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या …

Read More »

शिवसेनेसह १६ राजकिय पक्षांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लागलेल्या हिंसक वळणास भाजपा जबाबदार असल्याची माहिती पुढे आली. त्यापार्श्वभूमीवर अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला होणाऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. …

Read More »

दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार ! शेतकरी आंदोलन हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी ६१ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरु असताना देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. दिल्लीतील आजच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले ते अयोग्य असून हिंसेचे समर्थन करता येणार नाही. परंतु या …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा ढोंगीपणा का? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा सवाल

भंडारा-चंद्रपूर : प्रतिनिधी काँग्रेसने बाजारसमिती रद्द करण्याचे आश्वासन का दिले? २००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने केला. महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? हा ढोंगीपणा का? असे प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना …

Read More »

डाव्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वतंत्र अजेंडा आझाद मैदानावर दोन्ही पक्षांचे मर्यादीत कार्यकर्त्ये हजर

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांच्या जवळपास सर्वच संघटनांनी एकत्रित येत मोर्चा काढला. या मोर्चात आदिवासी, कातकरी आणि शेतमजूरांचा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. मात्र या मोर्चाचे सारे श्रेय मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे फारसे कार्यकर्त्ये न आणता श्रेय लाटल्याचे चित्र आजच्या सर्वच घटनांवरून दिसून येत …

Read More »

सात-बारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव ! आझाद मैदानातील शेतकऱ्यांचा एल्गार देशाला दिशा देणारा ठरेल: बाळासाहेब थोरात

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कडाक्याच्या थंडीत मोदी सरकारने शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा केला तरिही शेतकरी मागे हटला नाही. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा ठरणार असून तो देशाला दिशा …

Read More »

राज्यपालांना कंगणाला भेटायला वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही शरद पवारांचा राज्यपालांना टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्यातल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. परंतु राज्यपाल गोव्याला गेले असून त्यांना कंगणाला भेटायला वेळ आहे. मात्र माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत शेतकऱ्यांना भेटायला वेळ नसल्याचा टोला लगावला. संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्राच्या …

Read More »

मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी मुंबईत होतायत पायी दाखल हजारोंच्या संख्येने पायी, वाहनाने मुंबईत दाखल होणार

भिवंडी: प्रतिनिधी केंद्र सरकारच्या तुघलकी कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणि शेती मालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी नवी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील हजारो शेतकरी पायी आणि वाहन मार्चने मुंबईकडे रवाना होत आहेत. मुंबईत आल्यानंतर राज्यातील शेतकरी राजभवनला घेराव घालून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय …

Read More »

१०-१२ वीच्या परिक्षेच्या तारखा जाहिरः बालविवाह होवू नये यासाठी प्रयत्नशील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १० वी ची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येणार असून निकाल ऑगस्ट २०२१ मध्ये निकाल जाहिर करण्यात येणार आहे. तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधी घेण्यात येणार असून जुलै २०२१ मध्ये १२ वीचा निकाल जाहीर …

Read More »

विधानसभाध्यक्ष पदाकरिता या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची नावे आघाडीवर

मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या ठिकाणी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला प्रथम पसंती असून त्यांच्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नावाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उचलबांगडी होणार असल्याच्या चर्चेने …

Read More »