मुंबई : प्रतिनिधी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशानात व्हावी ही महाविकास आघाडीचीही इच्छा आहे. परंतु या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष राज्यपालांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत म्हणाले की, पण त्याला आम्ही भिक घालत नाही. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आमदारांच्या कोविड चाचण्या झाल्यानंतरच …
Read More »नव्या सांस्कृतिक धोरणासाठी तज्ञ समितीची लवकरच स्थापना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१० मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण आणण्यात आले होते. आता जवळपास ११ वर्षानंतर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नवीन धोरण आणण्यात येणार आहे. या नवीन धोरणाचे प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समितीचे प्राधान्याने गठन करण्यात यावे अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले. सांस्कृतिक …
Read More »फि भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचा हक्क डावलणाऱ्या शाळांवर होणार ही कारवाई शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून अनेक शाळांकडून फि भरली नाही म्हणून ऑनलाईन शाळेच्या वर्गाला प्रवेश न देण्याचे धोरण अवलंबलेले आहे. त्याविरोधात पालकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करत कडक कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाला आज दिल्याची …
Read More »मंत्रालयातील प्रवेशासाठी आता असे राहणार सुधारीत नियम: सर्वांसाठी लवकरच खुले राज्य सरकारकडून सुधारीत आदेश जारी
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंत्रालयात आमदार, खासदार यांच्यापासून ते सर्वसामान्य व्यक्तींसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र आता तब्बल दिड वर्षानंतर सर्वसामान्य नागरीकांपासून ते सर्वच शासकिय अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्रातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरीकांसह इतरांच्या वाहनांनाही …
Read More »जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल मोदी व फडणवीस सरकारनेच ओबीसी समाजाचा घात केला-नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती, पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. आता मात्र भाजपा नेते ओबीसींचा …
Read More »संन्यास घेवू म्हणणारे, धनगर आरक्षणाचे काय झाले? ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपाचे पाप
मुंबई, दि. २७ जून ओबीसी समाजाला चार महिन्यांत आरक्षण देईन अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न विचारुन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा …
Read More »#BreakTheChain अंतर्गत सोमवारपासून फक्त या गोष्टींना परवानगी ! कोविड-19 निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण
मुंबई : प्रतिनिधी राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वास विभागामार्फत ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जून २०२१ पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ,खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जेणेकरून निर्बंधांची अंमलबजावणी करताना त्यात गैरसमज किंवा अस्पष्टता येणार नाही. जमाव/ मेळावे 1- जमावाची व्याख्या ‘एका सामुहिक कारणासाठी …
Read More »राज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना
मुंबई: प्रतिनिधी कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. आगामी ४ ते ६ आठवड्यात कोव्हीड अर्थात कोरोनाची तिसरी लाट येवू शकते असा इशाराही सर्व जिल्हास्तरीय प्रशासनाला आज एका आदेशान्वये दिला. …
Read More »देशमुखांवरील कारवाई आणि भाजपातेर आघाडीबद्दल काय म्हणाले शरद पवार? पवारांच्या उपस्थितीत पुण्यात सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई-पुणे: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील पाच घरांवर ईडीने छापे टाकले. या ठिकाणी ईडीनं शोधसत्र सुरू केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असतानाच पवार म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांना आलेल्या …
Read More »..तर मंत्र्यांना फिरू देणार नाही भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारला इशारा
मुंबई: प्रतिनिधी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळावी या मागणीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी करत राज्य सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही तातडीने केली नाही तर या …
Read More »
Marathi e-Batmya