Tag Archives: congress

माजी खासदार एकनाथ गायकवाड मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीकडून नियुक्ती जाहीर

मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून मुंबईला अध्यक्ष नसल्याबाबतची ओरड होत होती. त्यामुळे अखेर मुंबई प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्ष पदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवामुळे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे …

Read More »

मतांच्या जोगव्यासाठी यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी दौरा करा मुख्यमंत्री फडणवीस यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा उपरोधिक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात खरीपाची पेरणीही झाली नाही. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी भाजप शिवसेनेचे नेते मतांचा जोगवा मागण्यासाठी राज्यव्यापी यात्रा काढून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. या नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी भागाचा दौरा करावा असा उपरोधिक सल्ला देत म्हणजे त्यांना …

Read More »

एमएमआरडीएच्या हद्दीत आता पालघर ते रायगड पर्यंत वाढ अधिसूचनेच्या ठरावास विधानसभेची मान्यता

मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर, रायगड, वसई, पेण, खालपूर, अलिबागच्या उर्वरीत भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी या सर्व भागांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याविषयीचा अधिसूचना प्रस्तावाचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला असता त्यास भाजप सदस्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुधारणा सुचवित …

Read More »

आर्थिक पाहणी अहवाल आहे की दिशाभूल अहवाल? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. मात्र या अहवालात कृषी क्षेत्राचा, उद्योग आणि बांधकाम क्षेत्राचा देण्यात आलेला विकास दर दिशाभूल करणारा असून यानिमित्ताने राज्य सरकारकडून विश्वासर्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचा आरोप करत हा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल आहे की दिशाभूलतेचा अहवाल असल्याचा खोचक सवाल …

Read More »

मुख्यमंत्र्याना पाहताच विरोधक म्हणतात आले रे आले चोरटे आले विधासभेत आणि पायऱ्यावर विरोधक आणि मुख्यमंत्री यांच्यात पहिल्याच दिवशी सामना

मुंबईः प्रतिनिधी आले रे आले चोरटे आले असं म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि मुख्यमंत्री असा सामना पाहण्यास मिळाला. गेली साडेचार वर्षे जे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी बाकांवर बसले होते ते आता भाजपा सरकारचे मंत्री म्हणून समोर आले. कारण त्यांनी भाजपात प्रवेश केला …

Read More »

सरकारच्या चहापानावर बहिष्कार; विरोधी पक्षांचा निर्णय फडणवीस सरकार म्हणजे 'आभासी' सरकार - धनंजय मुंडे

मुंबईः प्रतिनिधी या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार असल्याचा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. १७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या …

Read More »

मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे टीकास्त्र

मुंबई: प्रतिनिधी भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. प्रकाश मेहता आणि इतर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे. लोकायुक्त आणि न्यायालयांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईचे आदेश दिले. मात्र मुख्यमंत्र्यांची या मंत्र्यांवर …

Read More »

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नवे विधिमंडळ पक्षनेते तर विजय वडेट्टीवार गटनेते

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या ठिकाणी कोण असा प्रश्न चर्चिला जात होता. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षनेते पदी काँग्रेसने वर्णी लावली. तर सभागृहातील उपनेते असलेले विजय वडेट्टीवार यांची सभागृहाच्या नेते पदी निवड करण्यात आली …

Read More »

भाजपाची बी-टीम आहे की नाही हे काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगावे वंचित आघाडी प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र आता त्यांच्याकडून आघाडीत समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यात येत आहेत. परंतु आम्ही भाजपची बी टीम आहोत का याचे स्पष्टीकरण सर्वात आधी कॉग्रेस-राष्ट्रवादीने करावे असा सवाल वंचित आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. भारिप-बहुजन संघाच्या कार्यालयात आयोजित …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात, चव्हाणांसह काँग्रेसच्या आमदारांनो भाजपात या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना रोज सतत फोन करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. इतकंच नाही तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्नही मुख्यमंत्री आणि भाजपातले इतर नेते करत असून राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अशोक …

Read More »