मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्षा खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धीने घेतला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. भाजप सरकारच्या या विद्वेषी कृतीचा तीव्र निषेध …
Read More »देवेंद्र म्हणाले माझी अडचण होईल…अमित शाह आणि कंपनीवर विश्वास नाही मुख्यमंत्री पदावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठाम
मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीसाठी युती करताना अमित शाह यांच्यासमोर मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे आताच जाहीर करू नका नाहीतर माझी पक्षात अडचण होईल अशी विनंती केली. आता ते मुख्यमंत्री पदाबाबत अशी चर्चा झालीच नसल्याचे सांगत मला खोट ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे प्रतित्तुर भाजपा नेते …
Read More »महाराष्ट्रात सत्ता स्थापन… आणखी एकदा चर्चेनंतर सांगेन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची सोनिया गांधींच्या भेटीनंतर माहिती
नवी दिल्लीः प्रतिनिधी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी महायुतीला आवश्यक असलेले संख्याबळ मिळूनही त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून भाजपाविरोधात कडक भूमिका घेतली जात आहे. परंतु राज्यातील राजकिय परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि आम्ही पुन्हा एकदा भेटणार असून त्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ संध्याकाळी सुटणार भाजपा, शिवसेनेचे डोळे लागले शरद पवार-सोनिया गांधींच्या भेटीकडे
मुंबईः विषेश प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ आता दिल्ली दरबारी पोहोचला असून हा घोळ सोडविण्यासाठी भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांना सकाळी भेटले, तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे पवार आणि गांधींच्या भेटीनंतरच राज्यातील सत्तेचा …
Read More »राज्याच्या राजकारणात पुन्हा प(ॉ)वार पॅटर्नच केंद्रस्थानी शरद पवारांच्या भूमिकेकडे भाजपासह शिवसेनेचे लक्ष
मुंबईः खंडूराज गायकवाड विधानसभा निवडणूकीचे निकाल लागून दहा दिवस होत आहेत. मात्र राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्षाचा तिढा कायम आहे. मात्र शिवसेनेच्या ताणाताणीला आणि भाजप-सेनेतील कलगीतुऱ्याच्या राजकीय घडामोडी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व्हेसर्वा शरद पवार हेच केंद्रस्थानी आल्याचे पुढे आल्याने राज्यातील राजकारणात शरद पवारच पॉवरफुल …
Read More »शपथविधी नाही झाला तरी नवी विधानसभा अस्तित्वात येणार राज्यपाल कोश्यारी यांचे घडामोडींवर बारीक लक्ष
मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास आठवडा झाला तरी राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भाजपा-शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. मात्र विद्यमान विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी नाही झाला तरीही १० नोव्हेंबरपासून नव्या सदस्यांची विधानसभा अस्तित्वात येणार असल्याची माहिती विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या …
Read More »वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १२ जागा धोक्यात ९ हजाराहून अधिकचे मतदान घेतल्याने महाआघाडीच्या जागा घटल्या
मुंबईः प्रतिनिधी राज्यात लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणूकीतही वंचित बहुजन आघाडी आपली किमया दाखविणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दुपारपर्यंत वंचितने आपली जादू दाखवित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ जागा धोक्यात आणल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार अरविंद भातंबरे यांना १४ हजार ८६३ …
Read More »वरळीत सेनेचा तर मातोश्रीच्या अंगणात काँग्रेस झेंडा वांद्रे पूर्व मध्ये सेनेच्या उमेदवाराचा पराभव करत काँग्रेसचे झीशान सिध्दीकी विजयी
मुंबईः प्रतिनिधी राज्याची संपूर्ण लक्ष वेधून राहीलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे युवानेते तथा ठाकरे घराण्याचे वारसदार आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवित आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. मात्र ठाकरे कुटुंबिय रहात असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघ मात्र यंदा शिवसेनेला राखता आला नाही. या परिसरात काँग्रेसचे झीशान सिध्दीकी यांनी विजय मिळविल्याने शिवसेनेला स्वतःचा …
Read More »मतमोजणीच्या कामासाठी पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या २४ रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व …
Read More »स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी ईव्हीएम मशीन टँपरींग होऊ शकते अशी जनभावना असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून केली आहे. प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व …
Read More »
Marathi e-Batmya