Tag Archives: congress

महाराष्ट्रात भाजपाचे ऑपरेशन कमळ? चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, अनेक असंतुष्ट लोक आमच्या संपर्कात आहेत

महाविकास आघाडीला (मविआ) दणका देण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. मविआचे अनेक खासदार आणि आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे अनेक खासदार-आमदार असंतुष्ट आहेत, ते आपल्यासमोर अस्वस्थता व्यक्त करत आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस… रात्रीच्या अंधारात मते वाढवून लोकशाहीचा खून, निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले …

Read More »

मोदी-अदानी भाई-भाईः काँग्रेसची संसदेच्या आवारात निदर्शने प्रियांका गांधी यांनी आणली मोदी-अदानी भाई भाई लिहिलेली बॅग

गौतम अदानी आणि अदानी कंपनीवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानीच्या विरोधात चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत काँग्रेसने चौकशीची मागणी लावून धरली. तसेच यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदी-अदानी भाई भाऊ असे लिहिलेली एक बॅग यांनी आणली. त्यावेळी ही बॅग प्रियंका गांधी यांनी हातात घेत सर्वांना दाखविली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी …

Read More »

खा वर्षा गायकवाड यांची मागणी, कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना जाहिर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, प्रत्येकी २५ लाख द्या

कुर्ला रेल्वे स्टेशन जवळ सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की आणखीन काही कारण असो, या दुर्घटनेतील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, …

Read More »

नाना पटोले यांचा निर्धार, बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे जनआंदोलन… मारकडवाडीतील गावकऱ्यांवर जबरदस्तीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या

भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन …

Read More »

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्यावर मंड्या गावी होणार अंत्यसंकार घरीच ९२ व्या वर्षी झाला मृत्यू

माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे मंगळवारी (१० डिसेंबर २०२४) सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ९२ वर्षीय एस एम कृष्णा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. तसेच त्यांना विस्मृतीचा आजारही जडला होता. एस एम कृष्णा यांनी त्यांच्या संपूर्ण राजकिय कारकिर्दीत परराष्ट्र …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली…आता ‘लाडका भाऊ’साठी काम.. सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतो, जनभावना पायदळी तुडवणे ही सत्तेची मस्ती

‘लाडकी बहिण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत, पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहिणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो …

Read More »

विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस

नव्या सरकारचा अर्थात महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच निवड पुन्हा एकदा करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधकांकडील आमदारांची संख्या कमी असल्याने विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर वगळता दुसरा कोणाचाही अर्ज विधानसभेच्या सचिवाकडे आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, … दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी मारकडवाडीप्रमाणे राज्यातील अनेक गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी ग्रामसभेचे ठराव

राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन …

Read More »

काँग्रेसच्या आमदारांनी राज्यघटनेची पुस्तिका हाती घेत शपथः ८ आमदार राहिले विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी १०६ सदस्यांनी सदस्यपदाची घेतली शपथ

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी ११४ पैकी १०६ नवनिर्वाचित आमदारांना विधानसभेच्या सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. …

Read More »