विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व …
Read More »नांदेड पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण तर एमआयएमकडून इम्तियाज जलील स्व. वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाली आहे. विधानसभा निवडणूकीबरोबरच राज्यातील लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणूकही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभा सदस्य राहिलेले वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी काँग्रेसकडून जाहिर करण्यात आली आहे. नांदेडचे माजी काँग्रेस …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, लाडकी बहीण’ च्या जाहिरातबाजीवर युतीकडून २०० कोटींची उधळपट्टी भगिनींना मदत करताना जाहिरातबाजी व चमकोगिरीची गरज काय?
काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु टेंडर घ्या व कमिशन द्या या भाजपा महायुती सरकारच्या धोरणानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर भाजपा युती सरकारने २०० कोटींची उधळपट्टी केली असल्याचा …
Read More »नाना पटोले यांचा टोला, मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’ नाही तर ‘रेट कार्ड’वर बोलावे भाजपा युती सरकारमुळे फक्त ‘लाडका उद्योगपती’ व ‘लाडके कंत्राटदार’च मालामाल; शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल.
कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एक होता पण फडणवीसांच्या काळात व शिंदे सरकारच्या काळात …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा सवाल मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, शिंदे म्हणाले, विरोधी पक्षनेते ठरवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
महायुती सरकार हे काम करणारे सरकार असून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. या कामाची पोचपावती आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार महायुतीला देतील,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी व्यक्त केला. मुंबईत बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती अशोक गेहलोत, भूपेश बघेल, चरणजितसिंह चन्नी, सचिन पायलट यांच्याकडे विभागनिहाय जबाबदारी
मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भासाठी छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उमंग सिंघर यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व तेलंगाणाचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली …
Read More »नाना पटोले यांचा निर्धार, मोदी शाहंचा विचार महाराष्ट्रात रूजू होऊ देणार नाही रमेश चेन्नीथला यांचे आवाहन, भाजपा युती सरकारच्या चुनावी जुमल्यांना फसू नका
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व मविआ सज्ज आहे. भाजपा युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही असे असतानाही दोन महिन्यात युती सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केवळ घोषणाबाजी केली असून ते सर्व चुनावी जुमले आहेत. जनतेने या …
Read More »भाई जगताप यांची मागणी, बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षिततेतील त्रुटींची चौकशी करा महायुतीच्या काळात मुंबई ‘गुन्हेगारीत’ पुढारलेलं शहर
बदलापूरच्या घटनेत ताब्यात असलेल्या आरोपीला गोळ्या घालणारे पोलीस बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली तेव्हा कुठे होते, असा सवाल करत या प्रकरणाची चौकशीची मागणी करत महायुतीच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, मुंबई शहर तर ‘गुन्हेगारीत’ दुसऱ्या क्रमांकावर आलं असल्याचा घणाघातही भाई जगताप यांनी केला. मुंबई काँग्रेसमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया’ योजना ‘फेक इन इंडिया’ भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकीला खीळ
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडला आहे. गेल्या दशकात आर्थिक धोरणनिर्मिती स्थिर, अंदाजे आणि समजूतदार ठरली नाही. भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे खाजगी गुंतवणुकीच्या वाढीला खीळ बसली आहे. नरेंद्र …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका,… पराभवाच्या भितीमुळेच मुंबईतील टोल माफी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील (MTHL) कार आणि लाईट मोटार वाहनांच्या टोल माफीचे काय?
मुंबईतील टोल नाक्यावर होत असेलल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण या मागणीकडे भाजपा युती सरकारने जाणीवपूर्वक कानाडोळा केला. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ असल्याची जाणीव झाल्यानेच हादरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर टोल माफी जाहीर केली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर …
Read More »
Marathi e-Batmya