विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किंमत देण्यापासून ते स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. त्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपाला त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची आठवण करून देत त्याची उत्तरे मागितली आहेत. जयराम रमेश यांनी एक्सवर ट्विट …
Read More »राहुल गांधी यांचा सवाल, उद्योगपतींना कर्जमाफी देणाऱ्या पंतप्रधानांकडून शेतकऱ्याची कर्जमाफी का नाही? मविआची सत्ता आल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये खटाखट, खटाखट जमा करु, शेतकरी कर्जमाफी व हमीभाव देऊ.
शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते? भाजपाचे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन, कापसाला भाव देत नाही. देशातील मुठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षात …
Read More »नाना पटोले यांची टीका, ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा देणाऱ्या भाजपाला अद्दल घडवा अकोट मतदारसंघातील काँग्रेस मविआचे उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची जाहीर सभा
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मंगळवारी दोन सभा चिखली आणि गोंदियात काँग्रेस माविआ उमेदवारांचा प्रचार करणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दोन निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगाव येथील पक्षाचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या सभांना राहुल प्रथम संबोधित …
Read More »नाना पटोले यांचे भाकित, ….मविआ जिंकली तर मोदींची सत्ताही जाणार जाती-धर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागल्याने ते हिंदू-मुस्लीम करत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन करत मविआ …
Read More »अशोक गेहलोत यांचा सवाल, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’ सारख्या घोषणांवर कारवाई का नाही? मविआचे सरकार चोरणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा
भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थान मध्येही भाजपाने प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने चोरले, त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली असून …
Read More »काँग्रेसचे १६ बंडखोर उमेदवारांना ६ वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या १६ जणांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून काव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे. …
Read More »भाजपाचा चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, काँग्रेसचा जाहीरनामा फसवा काँग्रेसने योजनांचे बजेट सांगावे
काँग्रेससह महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मतांच्या लागूंलचालनाकरीता काँग्रेस खोटारडेपणा करीत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून, काँग्रेसच्या रक्तात विकास नाही, असेही ते म्हणाले. नागपूर येथे ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी योजनांच्या …
Read More »नाना पटोले यांची मागणी, आयोगाने पोलिस महासंचालक वर्मा यांच्या नियुक्तीबाबत हस्तक्षेप करावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
महाराष्ट्र सरकारने संजय कुमार वर्मा यांची पोलीस महासंचालक (DGP) म्हणून सशर्त नियुक्ती करण्याची कृती ही घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि स्थापित प्रशासकीय तत्त्वे यांचे उघड उघड उल्लंघन करणारी आहे. यामुळे पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ व निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागले म्हणून निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांचा वापर …
Read More »अमित शाह यांची निवडणूकीला नवी उपमा, शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यातील लढाई जाहिरसभेत बोलताना महायुती आणि महाविकास आघाडीतील निवडणूकीच्या सामन्याला दिली उपमा
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला अवघे १० दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यातच भाजपाचे नेते पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यातील निवडणूकीच्या प्रचारात प्रवेश होवून दोन दिवस झाले. तरी भाजपाच्या प्रचारात म्हणावा तशी हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणाचे मुद्दे म्हणावे तसे आले नसल्याचे दिसून येत होते. मात्र आता आठभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना …
Read More »
Marathi e-Batmya