दिल्ली प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार कोणाकडे यावरून तीन वर्षाहून अधिक काळ सुरु राहिलेल्या न्यायालयीन लढाईत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा विजय झाला. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही दिल्लीतील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार स्वतःकडेच रहावेत या साठी मोदी सरकारने नव्याने अध्यादेश काढत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अप्रत्यक्ष रद्दबादल ठरविला. मोदी सरकारच्या या अध्यादेशाच्या विरोधात …
Read More »दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या पत्नीचा आरोप आणि पार्टी आयोजक व्यावसायिकाचा खुलासा कौशिक यांच्या पत्नीने १५ कोटी रूपयांसाठी खून केल्याचा आरोप पार्टी आयोजक व्यावसायिक विजय मालू यांनी व्हिडिओ जारी करत केला खुलासा
सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पण सतीश यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस तपास करत आहेत. सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. यादरम्यान विकासच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर …
Read More »अखेर उमर खालीद, खालीद सैफीसह पाच जणांना न्यायालयाने सोडले
२०२० साली ईशान्य दिल्लीतील दंगलप्रकरणी तुरुंगात असलेल्या उमर खालीद, खालीद सैफी यांच्यासह पाच जणांची न्यायालयाने सुटका केली. उमर खालीद हा विद्यार्थी नेता असून जेएनयु येथे कन्हैयाकुमार आणि उमर खालीद यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर उमर खालीदच्या विरोधात सातत्याने भाजपाशासित राज्यांमध्ये गुन्हे नोंदविले जात होते. यापार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीतील दंगलप्रकरणी खजुरी खास …
Read More »छगन भुजबळ म्हणाले, दिवस येतात आणि जातात जरा धीर धरा… महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न;मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार
महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला देखील आधार देण्याचं काम महाराष्ट्र करतो हे कुणीही विसरू नये अशी टीका करत महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात जरा धीर धरा आपले दिवस परत येतील असा सबुरीचा सल्ला राज्याचे माजी मंत्री …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, आम्हाला गाजरं, चॉकलेट नको…मुख्यमंत्री फक्त स्वत:साठी दिल्लीत प्रकल्पाची कोणतीच माहिती मुख्यमंत्र्यांना नाही
मागील काही दिवसांपासून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यापाठोपाठ बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस प्रकल्प एकामागो एक महाराष्ट्रातून गेले. तसेच मुंबईतल्या वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी लागणाऱ्या अभियंत्याच्या मुलाखती महाराष्ट्राऐवजी चेन्नईत घेण्यात येत असल्यावरून युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तळेगांव …
Read More »परिक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : ३० सप्टेंबर पूर्वी परिक्षा घ्याच अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे सर्व राज्य सरकारांना बजावले
नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा ऐच्छिक घेण्याबाबतचा निर्णय घेत अनेक विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज निकाल देताना परिक्षेची तारीख फारतर पुढे ढकलता येवू शकते. मात्र परिक्षा घ्यावीच लागणार असल्याचे स्पष्ट करत परिक्षेशिवाय विद्यार्थ्यांना प्रमोट किंवा बढती …
Read More »
Marathi e-Batmya