धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा प्रकल्प आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारक, जलद, दिलासादायक आणि वेळेची बचत करणारा होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील पुढचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या लोकार्पणाप्रसंगी सांगितले. या प्रकल्पामुळे मरिन ड्राईव्ह ते …
Read More »नाना पटोले यांचा खोचक सल्ला,… फडणवीस-शिंदेंनी अभ्यास करून बोलावे भाजपा व RSS हेच खरे आरक्षणविरोधी; आरक्षण व संविधानावर भाजपाने बोलूच नये
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपाची मातृसंस्था आरएसएस मानत नाही. आरक्षणाला RSS चाच विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे अशी जाहीर वक्तव्ये …
Read More »महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये १९ टक्के वाढ उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्यादी अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील ऊर्जासंबंधी कार्यरत या तीनही कंपन्यांमध्ये काम …
Read More »राज्यातील आरटीओ कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित अंमलबजावणी नाहीच
मोटार वाहन – आरटीओ विभागासाठी आकृतीबंध मान्यतेचा शासन निर्णय जारी झाला. अत्यंत नगण्य अशा पदोन्नतीच्या संधी असल्याने सदर शासन निर्णयाने कर्मचा-यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले. परंतु मागील दोन वर्षात काही तांत्रिक बाबींचा बाऊ करुन आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस टोलवाटोलवी करत या शासन निर्णयाची अंमबलबजावणी केली जात नसल्याच्या निषेधार्थ आरटीओ कर्मचारी संघटनेने बेमुदत …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुतीने केंद्राच्या पाया पडावं
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि …
Read More »आशिष शेलार यांची मागणी, उबाठाने….माफी मागावी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून शेलार यांची मागणी
उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही लालबागच्या राजाची परंपरा खंडित केलीत, सार्वजनिक गणेशोत्सव रोखलात, गणेशभक्त आणि बाप्पाची ताटातूट केलीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी गणेशभक्त आणि लालबागच्या राजाची पायावर नाक घासून माफी मागावी, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. …
Read More »संजय राऊत यांची खोचक टीका, आता लालबागचा राजा ही… अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून साधला निशाणा
सध्या राज्यासह देशाच्या अनेक भागात गणेशोत्सवाची धाम धुम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते महायुतीच्या नेत्यांची एक बैठक घेणार असून लालबागच्या राज्याचे दर्शनही घेणार आहेत. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर खोचक …
Read More »आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांकडून स्विकारणार राज्य सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून शासन निर्णय जारी
आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील महिला वर्गाला (मतदारांना) आकर्षित कऱण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहिर केली. तसेच योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रूपये देण्याचा निर्णयही जाहिर केला. या योजनेच्या लाभार्थ्यांना दोन-तीन महिन्याचे हप्तेही देण्यात आले. मात्र यापूर्वी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून या योजनेसाठी अर्ज घेण्यात येत होते. …
Read More »सुप्रिया सुळे यांचे आव्हान, भाजपाने तो व्हिडिओ दाखवावा… शिंदे से बैर नही देवेंद्र तेरी खैर नही...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्टवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना दिलेल्या काही आदेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनात नेमकं काय आहे असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदेसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नहीं, अशी नवी …
Read More »शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू धोंदलगाव सौर ऊर्जा प्रकल्प सुरु
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात झाला. या प्रकल्पामुळे १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध …
Read More »
Marathi e-Batmya