मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारं सरकार आहे. लोकांचा पाठिंबा नाही हे वारंवार सिद्ध होत आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे – फडणवीस सरकारवर केला. आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनात पार पडली. त्यानंतर …
Read More »महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही आप्पासाहेबांची भेटही घेत …
Read More »उध्दव ठाकरे यांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा, तर उद्योगपतीही मुख्यमंत्री-पंतप्रधान होऊ शकतात न्यायालयाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित होते
जवळपास मागील सात महिन्यापासून शिवसेना उध्दव ठाकरे गटाची की शिंदे गटाची यावरून राज्यात उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात सातत्याने सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे. त्यातच भाजपाकडून काही विशिष्ट उद्योगपतींसाठी धोरण राबविले जात असून उद्योगपतींच्या आर्थिक …
Read More »आदित्य ठाकरेंची टीका, कितीही नेते येऊ दे गल्लीगल्लीत फिरायला लावणार वरळीतील शिंदे-फडणवीसांच्या सत्कारावरून साधला निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ७ फेब्रुवारी रोजी वरळीत जाहिर सत्कार होणार आहे. यावरून युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कितीही नेते येऊ दे वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी विजय आपलाच होणार, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. आदित्य ठाकरेंच्या संवाद …
Read More »मुख्यमंत्री फेलोशिपसाठी या तारखेपर्यंत अर्ज करा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे …
Read More »भाजपाही करणार मुख्यमंत्री शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम पण(?) घोटाळ्यातील दलाल आणि संबधितांचे कनेक्शन गोळा करण्याचे काम सुरु
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नंबर दोनचे नेते राहिलेले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार ते मागील आठ वर्षात नगरविकास मंत्री म्हणून काम करत असतानाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तींनी आणि समर्थकांनी केलेल्या कामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली असून त्यासाठी भाजपाची खास टीम …
Read More »महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आता अंबानी-अदानीसह या उद्योजकांच्या सल्लानुसार होणार महाराष्ट्रही आता उद्योजकांच्या घशात- राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर नियुक्ती
साधारणतः अडीच वर्षापूर्वी भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर करताना त्यावेळचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनची बनविणार असल्याची घोषणा विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यानंतर त्यादृष्टीने कोणतीच कारवाई झाली नाही. मात्र आता हिंडेनबर्ग रिसर्च संस्थने जाहिर केलेल्या अहवालामुळे अदानी ग्रुप यांच्या व्यावसायिक विश्वासहार्तेवर प्रश्नचिन्ह …
Read More »अजित पवार म्हणाले, काहीही जण सकाळी सकाळी टाकतात तर मी कामाला सुरुवात करतो पवारांचा रोख मनसे प्रमुख राज ठाकरेंकडे तर नाही ना चर्चेला सुरुवात
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील सभेत बोलताना राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, राज्यात न आलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांवरील स्थगितीवरून राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात नवं सरकार स्थापन होऊन ६ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार …
Read More »जयंत पाटील म्हणाले, गांधीजींच्या मंत्राचा केंद्राला विसर मात्र फडणवीसजी ती चूक करू नका माजी अर्थमंत्री म्हणून जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांना सुचवले गांधीजींचे विचार...
महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून राज्याचा आर्थिक कारभार सांभाळल्यामुळे आपल्या अनेक शंकांसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुढील मंत्र नक्कीच अंमलात आणावा असे विश्वासाने सांगू शकतो मात्र दुर्दैवाने केंद्रसरकारला त्याचा विसर पडला असून आपण ती चूक करू नये असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत देवेंद्र …
Read More »बच्चू कडू यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल, मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? मला मंत्रिपद द्या असे म्हणणार नाही पण विस्तार करा
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा सातत्याने सुरु होती. अखेर राज्य सरकारला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर याबाबत मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरुवातीला दिवाळीनंतर असे जाहिर केले त्यानंतर हिवाळी …
Read More »
Marathi e-Batmya