Tag Archives: devendra fadnavis

पालघर अपघात : मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत वितरित

पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर एकूण ६५ लाख रुपयांच्या मदतीची रक्कम जिल्हाधिकारी, पालघर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पुण्यात १० वर्षात ४०० कोटींची गुंतवणुक आणि एक हजार रोजगार निर्मिती राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार

राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील दहा वर्षांत सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच  आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, पेट्रोल पंप बंद, महागाई वाढली, सरकार खरं का बोलत नाही? राज्यातील यंत्रणा कुलमोडली, पुणे बनले ‘क्राईम कॅपिटल’, पेट्रोल-डिझेल दरवाढ ही फक्त सुरुवात पिक्चर अभी बाकी है

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत काही आश्वर्य वाटत नाही. ही फक्त सुरूवात आहे, पिक्चर अभी बाकी है कशाचेही सोंग घेता येते हो पण पैसे आणि अन्नधान्याचे सोंग घेता येत नाही असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल पंप …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, मुख्यमंत्री कितीही खोट बोलत असले तरी…हेच सत्य वाशिम जिल्ह्यांत इंधन टंचाई आहे हे सत्य

मुख्यमंत्री कितीही खोटं बोलत असले, तरी महाराष्ट्रातील चित्र इंधन टंचाईची सत्य परिस्थिती सांगणारं आहे. वाशिम जिल्ह्यात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्रंदिवस रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळणे अवघड झाले असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, जर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर येरवडा, ठाणे, रत्नागिरी, नागपूर येथील मानसिक रूग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर

महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करणे हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून, गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेला दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प …

Read More »

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि अविवाहीत महिलासांठीचे धोरण

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने संसाराचा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, आपत्ती व्यवस्थापनासाठी एआय आधारित ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करा एआय आधारित एकात्मिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणार

राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी व  आपत्ती व्यवस्थापनाबाबत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुंबई टेक वीक अधिक भव्य ओपन ए आय,मेटा, एंथ्रॉपिक आणि क्लाउडगुगल यांसारख्या जागतिक अग्रगण्य ए आय कंपन्यांचा सहभाग

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात AI स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मुंबई टेक वीकसारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई टेक वीक (MTW) २०२६ ची घोषणा सह्याद्री अतिथिगृहात केलीत्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप, युनिकॉनची राजधानी पुढील दोन वर्षात महाराष्ट्र सिंगापूर आणि युएई ला मागे टाकणार, संशोधन, नवोपक्रम व जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भरारी

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या साह्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवित आहे. संशोधन, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आर्थिक उत्पन्न या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जवळपास देशातील कुठलेही राज्य नाही.  नवीन उद्योग,  तंत्रज्ञानातरीत व्यवसाय आणि डाटा सेंटर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही मजबूत परिसंस्था बनत आहे. त्यामुळे संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, जलयुक्त शिवार अभियानातील कामे गतीने पूर्ण करा राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा २०२६ संपन्न

यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामे आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष …

Read More »