सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समुह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई-सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना आशियाई विकास बँक (एशियन डेव्हलपमेंट बँक) च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आशियाई …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, अब्दुल गद्दार…
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही अब्दुल सत्तारांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. निषेध करताना आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांचा उल्लेख ‘अब्दुल गद्दार’ असा केला आहे. तसेच अशी घाणेरडी लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवी आहेत का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारला विचारला आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सत्तार यांच्या घरावर निदर्शने
औरंगाबाद येथे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अश्लिल शिवी देत आक्षेपार्ह विधान केले. शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात खोक्यावरून सुळे यांनी डिवचल्याबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता अब्दुल सत्तार यांनी शिवी देत विधान केले. सत्तार यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या …
Read More »राष्ट्रवादीचा इशारा, २४ तासाच्या आत सत्तारांची हक्कालपट्टी करा अन्यथा…
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ऑन कॅमेरा शिवी देत अवमान केला. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत हक्कालपट्टी करण्याची आग्रही मागणी केली. विशेष म्हणजे कृषी मंत्री अब्दुल …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, ठाण्यात नवी चित्रनगरी
मराठी नाट्य, चित्रपटसृष्टी जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दामले यांचा मुख्यमंत्री …
Read More »सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री पुन्हा असामान्य ? सीएमओत जाण्यासाठी मंत्रालयाची वेळ
साधारणत: तीन महिन्यापूर्वी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहेत असे सांगत कोणीतीही अडचण घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या अडी-अडचणी ऐकून घेत आणि त्यावर तात्काळ फोन करून पुढील आदेश देत असत. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्ता हवी होती म्हणून परिवर्तन केलं नाही तर…
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या आमदारांना सुरुवातीला सूरत मध्ये आसरा देण्यात आला. तेथून हे सर्व जण भाजपाशासित आसाम आणि गोवा येथे गेले. त्यावेळी या फुटीमागे भाजपा नसल्याचे त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र यामागे भाजपाच असल्याची चर्चा प्रसारमाध्यमात होती. या साऱ्या …
Read More »अजित पवारांच्या टीकेला शिंदे गटाचे मंत्री देसाई प्रत्युत्तर म्हणाले, मग ती बेईमानी नव्हती?
सध्या शिर्डीत सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, ज्या घरात वाढलो त्याच घराला उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री शिंदेवर …
Read More »सरन्यायाधीश लळीत म्हणाले, राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा
आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते …
Read More »२५२ तृतीयपंथीयांना घरे मिळणार घरे
नागपूर सुधार प्रन्यासने बांधलेली २५२ घरे तृतीयपंथीयांना देण्यात येणार असून त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाला दिले. सामाजिक न्याय विभागाने नागपूरच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशात तृतीयपंथीयांना घरे देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, यापुढे मैला उपसण्यासाठी …
Read More »
Marathi e-Batmya