Tag Archives: farmers issue

शेतकरी आंदोलन, न्यायालयाचा निर्णय आणि बच्चू कडू यांची भूमिका आंदोलन सुरु असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी नागपूरात प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक वर्तमान पत्रांनी वृत्त दिले. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने आंदोलनाची दखल घेत आंदोलकांना हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. पोलिसांनीही न्यायालयाची प्रत घेऊन आंदोलकांना हटविण्यासाठी गेले, मात्र आंदोलक शेतकऱ्यांची भूमिका पाहता पोलिस …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे आंदोलन महानगरपालिका क्षेत्रातील प्रश्नांवर ४ मार्चला महानगरपालिका क्षेत्रात काँग्रेसचे आंदोलन.

भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे व जनतेची …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला भेटण्यास शेतकरी संघटनांचा नकार शेतकऱ्यांच्या एका संघटनेचा समितीला भेटण्यास विरोध

पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलन करत असताना, अलीकडेच, संयुक्त किसान मोर्चा (राजकीय) ने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीला भेटण्यास नकार दिला. ४ जानेवारीला भारती किसान युनियनने असेच केले. समितीने संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) सदस्यांची भेट घेतली आहे, ज्यात आमरण उपोषणावर असलेले शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे आव्हान,… शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, दूध, कापसाच्या भावावर बोला महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधींनी पुनर्जन्म घेतला तरी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करु शकत नाहीत अशी दर्पोक्ती करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत ३७० कलमाचा काय संबंध? महागाई, बेरोजागारी प्रचंड वाढली आहे, महाराष्ट्रातील शेतकरी …

Read More »

रविकांत तुपकर यांच्याबरोबरील बैठकीत अजित पवार यांनी दिले हे आश्वासन सोयाबीन, कापसासह शेतमालाला योग्य वाढीव हमीभाव देण्यासह केंद्र शासनाची अनुकुल भूमिका

शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकुलता दर्शविली आहे. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे …

Read More »

डॉ अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल, सरकार मध्ये एक फूल, दोन डाउनफूल…

मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजपा सरकार मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे. तर सातत्याने दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रश्नावरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी हल्लाबोल केला. राज्यातील शेतकरी आणि महिला, बेरोजगारी या मुद्यावर आयोजित राष्ट्रवादीचे खासदार …

Read More »

अजित पवार यांचे आश्वासन, कांदा, इथेनॉल बंदीप्रकरणी अमित शाह यांना भेटणार

केंद्र सरकारने पुन्हा एकदा कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज सोलापूर सह नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात घोषणाबाजी करत कांद्याचा लिलाव बंद पाडला. त्याचबरोबर केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी दिलेल्या परवानगीवर बंदी आणली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे पडसाद सध्या विधिमंडळाच्या …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, …शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, पोकळ घोषणा नको सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही

राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, त्याचा सर्वेही केलेला नाही. सरकारकडे तलाठी, कृषी सहाय्यक ही यंत्रणा नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने …

Read More »

नाना पटोले यांची टीका, शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार राज्यात कॅसिनो सुरु करून तरुणांना बरबाद करण्याचा भाजपा सरकारचा डाव

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पण सरकार फक्त कडक कायदा करु म्हणत वेळ मारुन नेत आहे. राज्यातील भाजपाप्रणित तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा

शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली, …

Read More »