Tag Archives: farmers

उद्धव ठाकरे यांचा टोला, सरकार आपल्या दारी दुष्काळ उरावरी…. अहमद नगरच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली टीका

काल मी असं ऐकलं की वीमा कंपन्यांना २५ टक्के रक्कम देता येतेय का ते पाहा, असं सरकारने सांगितलं. पण २५ टक्के कुठून काढलंत आपण. १०० टक्के नुकसान झाल्याचं दिसतंय, तिथे पंचनामे कधी करणार? पाऊस लागला तर सरकार म्हणेल की पाऊसच पाऊस चहुकडे. अशा परिस्थितीत सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी …

Read More »

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का? घरी बसून या प्रकारे तपासा घरी बसून या प्रकारे तपासा

देशातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. अनेक शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवते. अशाच एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना हे पैसे वर्षभरात …

Read More »

पीक विमा अग्रिम, पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था याविषयी मुख्यमंत्र्यांचे निर्देश कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजन करावे

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ८१.०७ टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यात १ ते ६ सप्टेंबर दरम्यान केवळ २४०५ म्हणजे सरासरी १३.६० टक्के पाऊस पडला आहे. २५७९ पैकी ४४६ महसुली भागात …

Read More »

शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ तीन लाख शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये अनुदान वितरीत होणार

राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

पीएम किसानचा लाभ वडील आणि मुलाला एकत्र मिळणार? हा आहे नियम केंद्र सरकारचा नवा नियम

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात.ही रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दिली जाते. शेतकऱ्यांना एका हप्त्यात २,००० रुपये मिळतात.नुकताच या योजनेचा १४ वा हप्ता देण्यात आला आहे. आता शेतकरी १५ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेचा लाभ …

Read More »

जयंत पाटील यांचा इशारा,…संकट उग्र होण्याची भीती शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिले पत्र

राज्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासमोर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या परिस्थितीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या पत्रात म्हटले की, राज्यात ऑगस्ट …

Read More »

कर्ज वसुली करिता शेतकऱ्यांना पाठवण्यात येणारी बँकेची नोटीस तत्काळ थांबवा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी

राज्यात सरासरीपेक्षा यंदा पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुली करिता नोटीस बजावण्यात येत आहे. मात्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मूग गिळून गप्प का बसलं आहे असा संतप्त सवाल महेश तपासे मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आज राज्य शासनाला विचारला. पुढे बोलताना महेश …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, नाफेडच्या दरातून कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का? कांद्याचे ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरुच राहील

शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्याचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही एवढे निर्दयी लोक सत्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि सरकार आता नाफेड मार्फत केवळ २ लाख टन कांदा २४१० रुपयाने खरेदी करणार आहे. या भावात कांद्याचा …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, नाफेडमार्फत २ लाख टन कांदा खरेदीचा निर्णय? केवळ धुळफेक मुख्यमंत्री बैठका घातायेत आणि उपमुख्यमंत्री जपानमधून निर्णयाची घोषणा करतात, सरकार नेमके कोण चालवतंय ?

केंद्र सरकारने अचानक कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्के केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार बंद पाडले. शेतकऱ्यांचा संताप पाहून राज्यातील तिघाडी सरकारने धावाधाव करत नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यातील बाजारात मागील महिन्यात ११ लाख टन कांदा आला व या महिन्यात आतापर्यंत ६.५ लाख टन कांदा आला आहे …

Read More »

शिंदे गटाचा घरचा आहेर, कांद्यामुळे दिल्लीतील सरकार गेलं तर सरकारही हलतं त्यामुळे… शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी करून दिली काँग्रेस सरकारच्या काळातील गोष्टीची आठवण

काही वर्षापूर्वी दिल्लीतील राज्य सरकार आणि काँग्रेसचे सरकार कांद्याच्या वाढत्या किंमतीवरून सत्तेतून पाय उतार व्हावं लागले. तर कोरोना काळापासून देशासह राज्यातील जनतेला सातत्याने महागाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर तसेच कांद्याच्या प्रश्नावर देशातील जनता आणि शेतकरी यांचा रोष किती मोठा असतो याचे ढळढळीत उदाहरणच शिंदे गटाच्या आमदाराने मोदी सरकार …

Read More »