मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील शेतकऱ्यांना मालाच्या विक्रीचे स्वातंत्र्य देण्यासाठी केलेल्या कृषी कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात राज्य सरकारने मांडलेली कृषी विधेयके म्हणजे केंद्राच्या कायद्यातील किरकोळ बदल आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण असून …
Read More »..तर मंत्र्यांना फिरू देणार नाही भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारला इशारा
मुंबई: प्रतिनिधी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळावी या मागणीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी करत राज्य सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही तातडीने केली नाही तर या …
Read More »आदेशनुसार माहिती सादर न केल्यानेच ओबीसींचे आरक्षण गेले! अजूनही वेळ गेली नाही, तातडीने पाऊले उचला : देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात यापुढे होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी एकही जागा राखीव असणार नाही. महाविकास आघाडी सरकारने आतातरी लक्ष घालून पुढच्या उपाययोजना तातडीने हाती घेतल्या पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राज्य सरकारला सवाल
मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आघाडी सरकारने काढलेल्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नसल्याने राज्य सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे. अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लशीची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का, असा सवाल प्रदेश भाजपाचे …
Read More »नाना पटोलेना भाजपाचे प्रतित्तुर, भ्रमातून बाहेर या, जनतेकडे लक्ष द्या भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कोणतीच टीका केलेली नसताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडणे दुर्भाग्यपूर्ण आहे. नाना पटोले यांनी भ्रमातून बाहेर यावे आणि आरोप – प्रत्यारोपांचा खेळ खेळण्यापेक्षा राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून कोरोनाकाळात जनतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन भाजपा …
Read More »उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही भाजपाचे युवक वॉरीअर्स व्हॉट्सअॅप ग्रुप आगामी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथील कार्यक्रमात बोलतानात उत्तर प्रदेशात युवकांचे व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मतपरिवर्तन करून ३०० जागा कशा जिंकल्या याची सांद्यत माहिती दिली. त्याधर्तीवर महाराष्ट्रातही राजकिय प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या युवकांना युवक वॉरीअर्स संकल्पनेच्या माध्यमातून भाजपा विचाराच्या आणि भाजपेतर विचाराच्या युवकांचे ग्रुप तयार करण्यात …
Read More »राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला
मुंबईः प्रतिनिधी आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राममंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका …
Read More »भाजपा २ ऱ्यांदा राम मंदिरासाठी घरोघरी जावून निधी गोळा करणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी अयोध्या येथील राम मंदिर जन्मभूमी उभारणीसाठी १९९० साली भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथ यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळीही यात्रेच्या दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात घरोघरी, व्यापारी, दुकानदारांकडून निधी गोळा करण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा या भव्य मंदिरासाठी ट्रस्टतर्फे होणाऱ्या निधी संकलनात भारतीय जनता पार्टी सक्रीय सहभागी होणार …
Read More »शेतकऱ्यांच्या लोकचळवळीची चौकशी करणारे निर्लज्ज सरकार! आरे कारशेडप्रमाणेच यातही सत्यच बाहेर येईल : केशव उपाध्ये
मुंबई : प्रतिनिधी स्थगिती, चौकशी, दमनकारी नीती याच्या बाहेर न निघालेल्या सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार? महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत निष्क्रिय सरकारने आता आणखी एका चौकशीची घोषणा करून शेतकर्यांच्या लोकचळवळीचा एकप्रकारे अपमानच केला आहे. तथापि सरकारने हवी ती चौकशी करावी, त्यातून सत्यच बाहेर येईल, असे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी …
Read More »महिलांवरील अत्याचार आणि बंद मंदिरांच्या विरोधात भाजपातर्फे १२, १३ रोजी आंदोलन भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवार १२ व १३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत …
Read More »
Marathi e-Batmya