Tag Archives: loksabha election 2024

नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करीता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली, पाण्यासाठी वणवण करायला लावले, त्याचा हिशेब करून त्याची शिक्षा त्या नेत्याला देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शरद पवार यांच्यावर माळशिरस, धाराशिव, लातूर येथे झालेल्या सभांतून जोरदार हल्ला …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका भटकती आत्मा…शरद पवार म्हणाले, ते खरंय

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच, बारामती आणि शिरूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील विरोधकांवर टीका करताना काही नेत्यांचे नाव न घेता काही भटकती आत्मा असल्याची टीका केली. तसेच या भटकती आत्मा असलेल्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले …

Read More »

हिंदूत्ववादी राजकारणात मुस्लिमांचा ओढा उद्धव ठाकरे यांच्याकडे

साधारणतः २०१९ साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना बाहेर पडली. त्यावेळी शिवेसना फक्त भाजपाला सोडून बाहेर पडली नाही तर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारही स्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्रात, मुस्लिम समाजाचे नेते आता या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे सशक्त भाजपाचा …

Read More »

अखेर उत्तर पश्चिम मुंबईतून रविंद्र वायकर यांची शिंदे गटाकडून उमेदवारी जाहिर

लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून अखेर खरी शिवसेना आणि नकली शिवसेना असा वाद भाजपाच्या नेत्यांनी राज्यात सुरु करू दिला. त्यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याविषयीची याचिका प्रलंबित आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी या आधीच जाहिर केल्याप्रमाणे जनतेच्या दरबारात खरी शिवसेना कोणाची हे दिसून येईल असे यापूर्वीच जाहिर केले. त्यातच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू …

Read More »

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात भाजपाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे चित्र देशाच्या राजकारणात पाह्यला मिळू लागले. त्यातच गुजरातमधील सूरत येथे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरवित भाजपा उमेदवाराला बिनविरोध घोषित केले. अगदी त्याच पध्दतीने मध्य प्रदेशातील काँग्रेस उमेदवाराने लोकसभा निवडणूकीत …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, …मोदींना निवडणूक आली की महाराष्ट्र आठवला का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून तेच तेच काँग्रेस विरोधी रडगाणे गायिले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. बारामती, माढा, सोलापूर आणि सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाची राजकिय ताकद म्हणावी इतकी सशक्त राहिली नाही. त्यामुळे या भागातील मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांवर पराभवाची छाया असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

पी चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य, कोणीही पंतप्रधान झाला तरी भारत तिसरी अर्थव्यवस्था एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला गौप्यस्फोट

कोणीही पंतप्रधान झाला तरी भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पुढे बोलताना पी चिदंमबरम म्हणाले की, लोकसंख्येचा आकार पाहता भारत हा पराक्रम करेल आणि त्यात “कोणतीही जादू” नाही. तथापि, जागतिक क्रमवारीत भारताने प्रतिष्ठित तिसऱ्या स्थानावर केव्हा प्रगती …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, चिकन मटन मासे खाण्यावर बंदी आणणारे सरकार…

उपस्थित जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद आणि उत्साह पाहून विजयाची खात्री असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले . तसचं ‘लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात एक नवी चळवळ निर्माण करणारी आहे. ह्या चळवळीतून निर्माण होणारी ऊर्जा आणि आपल्या महाराष्ट्राची माती दिल्लीचा तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही.’ हा विश्वास उपस्थितांना दिला. मोदी सरकारच्या घोषणांवर आदित्य ठाकरे यांनी …

Read More »