Tag Archives: markadwadi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारकडवाडी, ईव्हीएम मशिबाबत काय दिले उत्तर अधिवेशनानंतर पहिला हप्ता देणार मात्र त्यात कोणताही बदल नाही

विधानसभा निव़डणूकीनंतर राज्यात नव्याने स्थापना झालेल्या महायुती सरकारकडून मुंबईत विशेष घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरात हिवाळी अधिवेशन घेण्यात आलं. या अधिवेशनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलेल्या अभिभाषणावर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी आपापली भूमिका मांडली. त्यानंतर यावेळी बोलताना विरोधकांनी बहुचर्चित लाडकी बहिण योजना, बीड आणि परभणी येथील घटनांचा उल्लेख करत राज्य …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, पवार साहेब, … म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये

ईव्हीएम मतदान पद्धतीवरून सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच प्रसंगी प्रशासनाबरोबर संघर्षाची तयारीही ठेवली आहे. त्यातच माळशिरसचे निर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनीही जर मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे राज्य सरकारने तयारी दर्शविली तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही यावेळी …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, … दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी मारकडवाडीप्रमाणे राज्यातील अनेक गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी ग्रामसभेचे ठराव

राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन …

Read More »

मारकडवाडीत जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती, लोकांची मागणी म्हणून निवडणुका बॅलेटवर घ्या खा. शरद पवार आणि जयंत पाटील यांची मारकडवाडीला भेट; ग्रामस्थांशी केली चर्चा

ईव्हीएम विरोधात लढा पुकारणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. जयंत पाटील यांनी मारकडवाडीच्या जनतेला संबोधित केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, या भागातून निवडून आलेले आमदार …

Read More »

शरद पवार यांचे मारकडवाडीतील ग्रामस्थांना आवाहन, तुमच्यावर दाखल केलेल्या खटल्याची… मी काय चुकीचं केलं शरद पवार यांचा सवाल

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मारकडवाडीतील ग्रामस्थाना उत्तम जानकर यांच्या बाजूने मतदान केले असताना मात्र भाजपाच्या उमेदवाराला एक हजार मतांचा लीड मिळाला. त्यामुळे ईव्हीएमच्या प्रणालीवर प्रश्न उपस्थित करत मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली. मात्र मारकडवाडीतील ग्रामस्थांवर पोलिस आणि स्थानिक प्रशासने गुन्हे दाखल केले. तसेच मिळालेल्या मतांच्या आधारे …

Read More »

मारकडवाडी प्रकरणाचे विधानसभेत पडसादः महायुतीच्या १७३ जणांनी घेतली शपथ महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचा सभात्याग

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाला ७ डिसेंबर या दिवशी प्रारंभ झाला. मात्र आज विधानसभेचे अधिवेशन सुरु होताच राज्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत मारकडवाडी प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत ईव्हीएम विरोधी घोषणा देत शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ४९ सदस्यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. परंतु सत्ताधारी महायुतीतील भाजपा, शिवसेना …

Read More »

अतुल लोंढे म्हणाले, ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली मारकडवाडीतून सुरु झालेली लोकशाही वाचवण्याची लढाई देशभर जाईल

लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल,.. मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव का केला ? पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच

विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर …

Read More »