राज्य मंत्रिमंडळातील मंत्री गिरिष महाजन यांच्याबाबत राज्य मंत्रिमंडळात आणि दस्तुरखुद्द भाजपामधील कार्यकर्त्यांच्यामध्येच विविध चर्चा सुरु असतात. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरिष महाजन यांच्यावर एक नवा आरोप केला असून एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत त्यासंदर्भात भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार …
Read More »आशिष शेलार यांची ग्वाही, ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार वांद्रे येथील पुनर्वसित रहिवाश्यांना करारपत्रे वितरित
विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत गौतम नगर येथील अनेक कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. वांद्रे पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसित होत असलेल्या रहिवाशांना त्यांच्या नवीन घरांचे करारपत्रे वितरणाचा कार्यक्रम …
Read More »जयकुमार गोरे यांची स्पष्टोक्ती, बारामतीची गुलामगिरी स्विकारली असती तर माण खटावला पाणी…. राजकारण संपलं तरी चालेल पण कधीच झुकणार नाही
एका महिलेला अर्धनग्न फोटो पाठविल्याप्रकरणी आणि त्याच महिलेला अटक करायला भाग पाडत, पत्रकार तुषार खरात याच्यासह राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत याच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी दाखल केला. त्यापार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेले भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी …
Read More »नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये शेतीपुरक उद्योगाने चांगला आकार घेतल्याचे आपल्या निर्दशनास येते. या दृष्टीने विचार करुन नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासकत्वाची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द …
Read More »मंगल प्रभात लोढा चित्ररथातून दाखवणार आरएसएचा १०० वर्षांचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास गौरवणारा चित्ररथ तयार
गुढी पाडव्यानिमित्त मुंबईमध्ये विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार झालेला चित्ररथ सहभागी होणार आहे. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे ३०० वे जयंती वर्ष, संविधान निर्मितीला झालेली ७५ वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी …
Read More »माणिकराव कोकाटे यांची माहिती, राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार विमा नुकसान भरपाई रु. २५५५ कोटी रूपये जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर
राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकोटे म्हणाले की, या निर्णयामुळे मागील विविध …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपावर रोहित पवार म्हणाले, महिलेला न्याय देण्यासाठी एक दोन वेळा फोन मंत्री जयकुमार गोरे प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपावर केले भाष्य
काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार गोरे यांना महायुती सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री पदाचे बक्षिस देण्यात आले. दरम्यान, एका महिलेला जयकुमार गोरे यांनी पाठविलेल्या अर्धनग्न फोटोवरून राजकिय वाद रंगलेला असतानाच या प्रकरणाला आता ब्लॅकमेलिंगचे वळण मिळाले आहे. त्यातच या प्रकरणी आरोपीचा संबध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित …
Read More »कुणाल कामरा प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन,…कठोर कारवाई करणार स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही
स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विडंबनात्मक गाण्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करणारे वक्तव्य केल्यावरून कुणाल कामरा यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे पक्षाचे अर्जून खोतकर यांनी केली. तसेच मंत्री शंभूराजे देसाई यांनीही याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अपमानजनक शब्द …
Read More »महसूल सुनावण्या डिजिटल होणार! महसूल विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात 'प्रत्यय' ऑनलाइन प्रणालीची अंमलबजावणी
राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने आज प्रत्यय ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू महसूल विभागाने आज महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »विधानसभेत नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी तर गृह राज्यमंत्री म्हणाले… दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे पडसाद
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचे पडसाद गुरुवार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विधानसभेत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सालियन मृत्यू प्रकरणी आरोप असलेल्या माजी मंत्र्यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांचा रोख शिवसेना …
Read More »
Marathi e-Batmya