Tag Archives: narendra modi

जयंत पाटील यांची मागणी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले ? CM, DyCm नी केंद्राला विचारावा , शेजारच्या राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही

या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाला विकास वाटचालीत सामावून घेणारा, सुखावणारे बजेट

गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून त्याचे राज्याच्यावतीने मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. देशाच्या आणि …

Read More »

अजित पवार यांची खोचक टीका, ‘अमृत काळ’चे वेस्टन लावून मूळ प्रश्नांना बगल देणारा अर्थसंकल्प’ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘चुनावी जुमला’ असलेला अर्थसंकल्प

लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे. …

Read More »

नाना पटोलेंची अर्थसंकल्पावर टीकाः आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने २०२२ मध्ये शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेचे काय झाले?

अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ही याच कार्यपद्धतीचा भाग आहे. या अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे ठोस काहीही नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मनरेगा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किंमती शेतमालाला किमान …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, देश बदलतोय… मोदी सरकारचे तोंड भरून कौतुक

भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्यानंतर आजपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनानिमित्त राज्यसभा आणि लोकसभा सभागृहाच्या दोन्ही सदस्यांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करताना राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, आपला देश बदलत असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे आता लोकांचा भारताकडे दृष्टीकोन बदलतोय. आपण ज्याची कामना करत होतो तो आधुनिक भारत …

Read More »

भाजपा-शिंदे गटाच्या हिंदू मोर्चावरून संजय राऊतांची टीका, मोदी-शाहचं राज्य आल्यापासून… रामसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंग यादवांचा पद्मविभूषण पुरस्कार गौरव

आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटाकडून आज रविवारी सकल हिंदू समाज या नावाखाली मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी केली. या मोर्चाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या अनुषंगाने संपर्क साधला असता ते म्हणाले, मागील …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी एसआयटीमार्फत करा घोटाळेबाज उद्योगपती अदानींची अवस्था ‘सहारा’च्या सुब्रत रॉयसारखी होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध सर्व जगाला माहित आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसीसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेचा पैसा मोदींनी आपल्या उद्योगपती मित्राच्या विविध कंपन्यांमध्ये कोणताही विचार न करता गुंतवला. अदानी कंपनीवर केलेल्या मेहरबानीमुळे कोट्यवधी रुपये डुबण्याची भिती निर्माण झाली असून या गैरव्यवहाराची संपूर्ण …

Read More »

काँग्रेसची टीका, उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर संकट अदानी’मुळे LIC व SBI मधील कोट्यवधी गुतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात !: अतुल लोंढे

अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार हिंडनबर्ग संशोधन संस्थेने उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान …

Read More »

वंचितप्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी काहीच चुकीचे वागत नाहीत उध्दव ठाकरे यांच्याशी युती केल्यानंतरही मोदींचे समर्थन

एकाबाजूला वंचित बहुजन आघाडी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठी एकत्र येत असल्याचे जाहिर करत नुकतीच वंचित आणि शिवसेनेने युती केली. या युतीच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे …

Read More »

CM Eknath Shinde : निवडणूक सर्व्हेक्षणावर मुख्यमंत्री म्हणाले, आकडेवारी समोर असती तर अंदाज … इंडिया टूडे सी-व्होटरच्या सर्वेक्षणात भाजपा-शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला अद्याप वर्षे दिड वर्षाचा कालावधी असतानाच देशासह महाराष्ट्रातील मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी इंडिया टूडे-सी व्होटर या कंपनीकडून नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचा तर भाजपा-शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे …

Read More »