पुणे: प्रतिनिधी प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. राज्यात त्या चार जणांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग आहे. पण प्रत्येकाने भान ठेवलं असतं तर हि वेळ आली नसती असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांचे नाव न घेता लगावला. …
Read More »ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वांचेच एकमत: अंतिम निर्णय येत्या ७ दिवसानंतर प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक
मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या …
Read More »बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? भाजपा आमदार गोपीचंद पडकरांची शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊतांवर टीका
सांगली-मुंबई: प्रतिनिधी आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असा खोचक सवाल करत असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल अशी बोचरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत …
Read More »भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी सत्तेचा कितीही दुरुपयोग करा, परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही नसल्याचे सांगत भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांना दिलेल्या धमक्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले. भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. …
Read More »अनिल परबांच्या त्या क्लिपची सीबीआय चौकशी करा संयमी माणसासोबत राहूनही शिवसेना संकुचित का राहते ? आशिष शेलार यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी ज्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक झालेली नव्हती, त्यापुर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब दूरध्वनीवरुन अनेक संशयास्पद बाबी बोलत असल्याची ध्वनी फित समोर आली आहे. राणे यांच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणेवर दबाव आणत होते, न्यायालयाबाबत काही गंभीर विधाने करुन अपमान करीत असल्याची व्हिडीओ क्लीप समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत …
Read More »बैलगाडी शर्यतींबाबत महिनाभरात मार्ग काढणार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन …
Read More »गृहमंत्री वळसे-पाटील यांची मोठी घोषणा तर आढळराव पाटलांचे त्यांनाच आव्हान भाजपापाठोपाठ आता शिवसेनाही आग्रही
पुणे: प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात काही प्रमाणात निर्बंध अद्यापही लागू असताना बैलगाडी शर्यतीवरून भाजपा आमदार गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला आव्हान देत या शर्यतीचे आयोजन केले. याप्रकरणी पडकरांसह अनेकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले असतानाच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याच उपस्थितीत १५ दिवसात गृहमंत्र्यांच्या मतदारसंघ …
Read More »आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मुलुंड शासकीय आयटीआय आणि आयटीसी हॉटेल लिमीटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार
मुंबई : प्रतिनिधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमीटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फुड …
Read More »प्रबोधनकारांच्या वाक्याचा संदर्भ देत राज ठाकरेंचे ते ट्विट नेमके कोणासाठी राज ठाकरेंच्या दृष्टीने बांडगुळ नेमके कोण?
मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष निर्माण झाल्याचा जाहिर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजना प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचण्याचा सल्ला दिला. त्यानंतर राज यांनी पवारांना प्रतित्तुर देत त्यांच्या वाक्यातील शब्दांचा अर्थ समजावून सांगावे असे आव्हान दिल्याला २४ …
Read More »रायगड जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कल्याणकर रायगडचे जिल्हाधिकारी तर वारभुवन आदिवासी विभागात
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने आज पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. ज्या आयएएस अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत चांगले काम करूनही रायगडच्या जिल्हाधिकारी यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना आयटी विभागाच्या संचालक पदावर नियुक्त …
Read More »
Marathi e-Batmya