Tag Archives: ncp

अखेर राष्ट्रवादीचा परिवार संवाद दौरा रद्द हिंगोली येथे पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली माहिती

हिंगोली: प्रतिनिधी राज्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवित असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज हिंगोली येथे पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा दुसरा टप्पा मराठवाड्यातील तुळजापूर आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन २४ जूनपासून सुरू करण्यात आली. त्यात यवतमाळ …

Read More »

सत्ता मिळाली की सर्वकाही करेन… ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

नांदेड: प्रतिनिधी सत्ता आल्याशिवाय मी काहीच करणार नाही महाराष्ट्रासाठी…मला सत्ता मिळाली की मी सर्वकाही करेन… सत्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीही करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. आम्हाला सत्ता द्या ओबीसी समाजाचे आरक्षण चार महिन्यात देतो …

Read More »

#BreakTheChain अंतर्गत सोमवारपासून फक्त या गोष्टींना परवानगी ! कोविड-19 निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण

मुंबई : प्रतिनिधी राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वास विभागामार्फत ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जून २०२१ पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ,खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जेणेकरून निर्बंधांची अंमलबजावणी करताना त्यात गैरसमज किंवा अस्पष्टता  येणार नाही. जमाव/ मेळावे 1- जमावाची व्याख्या ‘एका सामुहिक कारणासाठी …

Read More »

खडसेंचा भाजपाला खोचक सल्ला “त्या” नेत्याचा राजकिय बळी का घेतला? ते पण सांगा ओबीसी आरक्षणप्रश्नी आक्रमक झालेल्या भाजपावर रोहिणी खडसेंचे टीकास्त्र

मुक्ताईनगर-मुंबई: प्रतिनिधी ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्यानंतर भाजपाने चांगलाच आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनालाच  जोडूनच भाजपामधल्या “त्या” ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकिय बळी का घेतला? ते पण सांगा असाल खोचक सल्ला एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपाला ट्विटरवरून दिला. भाजपामधील ओबीसी …

Read More »

ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख म्हणाले… देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई: प्रतिनिधी आज सकाळपासून ईडीने मुंबई आणि नागपूरातील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबधित व्यक्तींच्या घरावर छापे टाकले. या दरम्यानच्या काळात आपण ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य केले असून ईडी आणि सीबीआयला असेच सहकार्य करू अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे …

Read More »

राज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. आगामी ४ ते ६ आठवड्यात कोव्हीड अर्थात कोरोनाची तिसरी लाट येवू शकते असा इशाराही सर्व जिल्हास्तरीय प्रशासनाला आज एका आदेशान्वये दिला. …

Read More »

देशमुखांवरील कारवाई आणि भाजपातेर आघाडीबद्दल काय म्हणाले शरद पवार? पवारांच्या उपस्थितीत पुण्यात सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई-पुणे: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील पाच घरांवर ईडीने छापे टाकले. या ठिकाणी ईडीनं शोधसत्र सुरू केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असतानाच पवार म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांना आलेल्या …

Read More »

मोदी सरकारने डाटा न दिल्याने ओबीसींवर ही वेळ ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भाजपचे राज्य सरकार असतानाच केंद्राने त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली. पाच वर्ष हातात असताना ओबीसींचे प्रश्न का सोडवले नाही असा सवाल करतानाच भाजपला खरी काळजी असेल तर त्यांनी केंद्राकडून इंपेरिकल डाटा घ्यावा. जनतेला सुद्धा माहित आहे, कोणी कोणाच्या घरी जाऊन आता डाटा गोळा करू शकत नाही. डाटा ताबडतोब …

Read More »

भाजपा कार्यकारणीने केली अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी मराठा, पद्दोनतीतील आरक्षण प्रश्नीही ठराव

मुंबई : प्रतिनिधी सचिन वाजे यांच्या पत्रातील उल्लेखाच्या आधारे ठाकरे सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करा, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत गुरुवारी करण्यात आली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षणा पाठोपाठ ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळ आली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण …

Read More »

मुंडे यांचा मोठा निर्णय :१० वी परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केलेल्या SC विद्यार्थ्यांना २ लाख आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना होणार लाभ

मुंबई: प्रतिनिधी SC अर्थात अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत …

Read More »