मुंबईः प्रतिनिधी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी वाऱ्यावर असल्याची टीका सर्वच पक्षांकडून होवू लागली. याची गंभीर दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली असून शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून हेक्टरी ८ हजाराची तर बागातयतदारांना १८ हजार रूपयांची मदत जाहीर केली. राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी किमान २ हेक्टर …
Read More »नवाब मलिक म्हणतात राऊतांना, ही तर आता प्रेमाची सुरुवात शिवसेनेच्या राऊतांच्या शेर ला राष्ट्रवादीच्या नवाब यांचा मीर च्या शायरीने उत्तर
मुंबईः प्रतिनिधी शिकाँरा आघाडीखालील सरकारच्या स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाटाघाटी सुरु आहेत. या आघाडीसाठी वातावरण निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून ट्टिटरवरून शेर-शायरी करत आहेत. मात्र राऊतांच्या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच प्रतित्तुर देत ही तर प्रेमाची सुरुवात असून …
Read More »शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची लवकरच दिल्लीवारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. शिवसेना सरकारला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची प्राथमिक तयारी झालेली असून अंतिम बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे लवकरच काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचे शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्याच्या सत्ताकारणापासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या …
Read More »शिकाँराच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान केव्हाही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांची सोमवारी बैठक
नवी दिल्ली-मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील किमान सामायिक कार्यक्रमावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोमवारी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्ली येथे जाणार असून त्यानंतर १९ ते २५ नोव्हेंबरच्या दरम्यान …
Read More »सर्वाधिक जागा आणि मते भाजपाला तर दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत सर्वात जास्त अर्थात १ कोटी ४२ लाख मते भाजपाला मिळाली आहेत. तर सर्वात जास्त १०५ आमदार निवडूण आले असून १४ अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला असल्याने ११९ आमदारांच्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होवू शकत नसल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच राज्यात भाजपानंतर सर्वात …
Read More »शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अर्थमंत्रालयाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे आश्वासन
नागपूर: प्रतिनिधी नागपुर आणि इतर जिल्हयात अतिवृष्टीमुळे संत्र्यांसह इतर पिकांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले असून संसदेच्या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल केंद्राच्या कृषी मंत्रालयात बैठक घेऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. विदर्भातील दोन दिवसीय दोऱ्यानंतर नागपूरात आयोजित करण्यात …
Read More »माजी मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातील शेतकऱ्यांची पवारांनी जाणून घेतली व्यथा दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर
नागपूरः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या महायुतीतील बेबनावामुळे भाजपाला सत्ता स्थापन करता आली नसल्याने सत्तेची गणिते कशी जुळवायची या प्रयत्नात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते आहेत. तर दुसऱ्याबाजूला सरकार स्थापनेच्या अनुषंगाने राजकिय चर्चा सुरु असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या पेटरी गावाला …
Read More »सामायिक कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांची समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्यात शिकाँरा अर्थात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसबरोबरील सामायिक कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि प्रवक्ते नवाब मलिक यांचा समावेश आहे. नरिमन पाँईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज राष्ट्रवादी …
Read More »शिकाँरा सत्तेत येणार…पण आधी आमचं ठरणार मगच सेनेशी चर्चा काँग्रेस नेते अहमद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात शिकाँरा महाआघाडी सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले. तत्पूर्वी आमच्या दोन पक्षातील बोलणी अंतिम होणार असून त्यानंतरच शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती …
Read More »राष्ट्रवादीची वेळ पूर्ण होण्याआधीच राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस राजवटीवर राष्ट्रपती आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब
मुंबईः प्रतिनिधी दिलेल्या मुदतीत राज्यातील सत्ता स्थापनेच्यासंदर्भात शिवसेनेकडून मागण्यात आलेल्या वाढीव मुदतीस नकार देत राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यासंदर्भात बोलाविले. त्यानुसार आज रात्रो ८.३० वाजेपर्यंतची मुदत राज्यपालांनी राष्ट्रवादींला दिली. मात्र ही मुदत पूर्ण होण्याआधीच राज्यपालांनी ३५६ कलमान्वये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात केंद्राला शिफारस केली. राज्यात …
Read More »
Marathi e-Batmya