मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीत जनतेने भाजपा-शिवसेनेच्या पारड्यात मतांचे पारडे टाकले आहे. तरीही त्यांच्याकडून अद्याप सरकार स्थापन केले जात नाही. मात्र त्यांना दिलेल्या मुदतीतील २४ तासापैकी २३ तास झालेले असतील तरी त्या शेवटच्या तासात कोणता तरी मार्ग निघेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत राज्यातील संभाव्य …
Read More »महाराष्ट्रात सत्ता स्थापन… आणखी एकदा चर्चेनंतर सांगेन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची सोनिया गांधींच्या भेटीनंतर माहिती
नवी दिल्लीः प्रतिनिधी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी महायुतीला आवश्यक असलेले संख्याबळ मिळूनही त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून भाजपाविरोधात कडक भूमिका घेतली जात आहे. परंतु राज्यातील राजकिय परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि आम्ही पुन्हा एकदा भेटणार असून त्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »व्हॉट्सअॅप हेरगिरीप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी व्हॉट्सअॅप हेरगिरी सरकारने एसआयटी स्थापन करावी आणि सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे उपस्थित होते. प्रसारमाध्यमांमध्ये सायबर …
Read More »राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ संध्याकाळी सुटणार भाजपा, शिवसेनेचे डोळे लागले शरद पवार-सोनिया गांधींच्या भेटीकडे
मुंबईः विषेश प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ आता दिल्ली दरबारी पोहोचला असून हा घोळ सोडविण्यासाठी भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांना सकाळी भेटले, तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे पवार आणि गांधींच्या भेटीनंतरच राज्यातील सत्तेचा …
Read More »राज्याच्या राजकारणात पुन्हा प(ॉ)वार पॅटर्नच केंद्रस्थानी शरद पवारांच्या भूमिकेकडे भाजपासह शिवसेनेचे लक्ष
मुंबईः खंडूराज गायकवाड विधानसभा निवडणूकीचे निकाल लागून दहा दिवस होत आहेत. मात्र राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्षाचा तिढा कायम आहे. मात्र शिवसेनेच्या ताणाताणीला आणि भाजप-सेनेतील कलगीतुऱ्याच्या राजकीय घडामोडी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व्हेसर्वा शरद पवार हेच केंद्रस्थानी आल्याचे पुढे आल्याने राज्यातील राजकारणात शरद पवारच पॉवरफुल …
Read More »शेतकर्यांना उभे करण्यासाठी हातभार लावा अन्यथा …. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा इशारा
नाशिक: प्रतिनिधी शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. सरकारने तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही याविरोधात ठोस भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज नाशिकमध्ये शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी केली. शेतकर्यांच्या झालेल्या …
Read More »नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी परतीच्या पावसाने राज्यातील शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले असून सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली. अहमदनगरच्या शेतकर्याने सोयाबीनचे उभं पीक पेटवून दिले. याचा अर्थ सरकारला शेतकर्यांच्या अडचणी कळत नसल्यानेच शेतकरी इतक्या टोकाची भूमिका घेत असल्याचे …
Read More »शपथविधी नाही झाला तरी नवी विधानसभा अस्तित्वात येणार राज्यपाल कोश्यारी यांचे घडामोडींवर बारीक लक्ष
मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास आठवडा झाला तरी राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भाजपा-शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. मात्र विद्यमान विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी नाही झाला तरीही १० नोव्हेंबरपासून नव्या सदस्यांची विधानसभा अस्तित्वात येणार असल्याची माहिती विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या …
Read More »जगावं की मरावं ? शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा पावसामुळे शेतकरी हवालदिल
नाशिकः प्रतिनिधी आमच्या हातचं पीक गेलंय… खूप नुकसान झालंय… जगावं की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे असे सांगतानाच सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही अशी माहिती नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी शेताच्या बांधावर गेलेल्या शरद पवार यांना शेतकऱ्यांनी कथन केली. परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना राष्ट्रवादी …
Read More »विजय सिंगच्या मृत्यूची मानवाधिकार आयोगामार्फत चौकशी करा आयोगात राष्ट्रवादी खटला लढविणार असल्याची प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी वडाळा पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूची मानव अधिकार आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोगाची भेट घेऊन केली. विजय सिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलिस अधिकारी आणि पोलिस …
Read More »
Marathi e-Batmya