शिर्डी: प्रतिनिधी राज्यात संकट आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची महाजनादेश यात्रा थांबवायला पाहिजे होती. मात्र त्यांची यात्रा सुरुच असून आम्ही आक्षेप घेतल्यावर त्यांनी एक दिवस बंद ठेवली. जर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेळीच सुचना द्यायला हव्या होत्या. मात्र डोक्यावरुन पाणी वाहायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आल्याचा उपरोधिक टोला अजितदादा पवार यांनी …
Read More »राज्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या बहुतांश भागामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत पूरामुळे १६ नागरिकांचा बळी गेला आहे. लाखो जनावरे वाहून गेली आहेत. पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय …
Read More »राज्यातील पुरस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना उशिरा जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपरोधिक टीका
मुंबईः प्रतिनिधी सततच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात गंभीर परिस्थिती असून कोणीही राज्यकर्ता असो या संकटग्रस्त लोकांना बाहेर काढण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजनैतिक कामात गुंतलेले होते. पण उशिरा का होईना ते त्यावर आता काम करतायत हे चांगलं असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली. काही निवडक …
Read More »यात्रा अर्ध्यावर सोडून पुरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी जयंत पाटील यांनी घेतली धाव रात्रभर पुराच्या पाण्यात फिरुन ग्रामस्थांना दिला दिलासा
सांगली: प्रतिनिधी सांगली जिल्हयातील अनेक गावांना पुराने वेढा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांच्या मदतीला धावून आले आहेत. स्थलांतरीत १४ हजार लोकांना जेवणाची सोय करत जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे दाखवून दिले. सांगली जिल्हयाला गेले दोन दिवस पुराने वेढा दिला असून नागरीकांचे मोठया प्रमाणात हाल …
Read More »१५ हजार शेतकर्यांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप
अहमदनगरः प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे भाजप – शिवसेना सरकारचे अपयश आहे. मात्र राज्यातील सगळ्या जनतेने गुण्यागोविंदाने नांदावे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. हे राज्य सुजलाम सुफलाम कसे होईल याकडे राष्ट्रवादीचे लक्ष असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केली. आज बेकारीने तोंड वर काढले …
Read More »पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सवाल
पुणे – राजगुरुनगर – खेडः प्रतिनिधी आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला केला. शिवस्वराज्य यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर – खेड येथे पार पडली. …
Read More »छत्रपतींचा आशीर्वाद घेवून राष्ट्रवादीच्या ‘नव्या स्वराज्याचा नवा लढा’ सुरु खा. डॉ.अमोल कोल्हे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले पूजन
जुन्नरः प्रतिनिधी नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्यासाठी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन त्यांचा आशिर्वाद घेवून आज करण्यात आली. ढोलताशांच्या गजर आणि जल्लोषात या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, …
Read More »राष्ट्रवादीची शिवस्वराज्य…’नव्या स्वराज्याचा नवा लढा’ यात्रा ६ ऑगस्टपासून २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा
कोल्हापूरः प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात ६ ऑगस्टला होणार असून शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरपासून सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. शिवस्वराज्य …
Read More »निवडणूक न लढविणारे ईव्हीएमवर बोलतायत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना टोला
मुंबईः प्रतिनिधी जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, ते आता कोलकात्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जाऊ लागले आहेत. या पत्रकार परिषदेतील काही नेते ईव्हीएम बाबत बोलत आहेत. त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही त्यांनी आधी निवडणूक लढवून दाखवावी. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी निवडणूकच लढविली नाही त्यांनी …
Read More »ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला विरोधात मोर्चा विरोधकांचा एल्गार
मुंबईः प्रतिनिधी ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत येत्या २१ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वांद्रे येथे झालेल्या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे …
Read More »
Marathi e-Batmya