Tag Archives: ncp

पहिल्यांदाच राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा विश्वास

मुंबईः प्रतिनिधी मागच्यावेळी शिवसेना- भाजपा ४२ जागा जिंकली होती. परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस २२ जागांच्यावर विजय मिळवेलच पण पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच महाराष्ट्रात राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. सध्या येणारे एक्झिट पोल ठिक आहेत. ते आपापल्या परीने …

Read More »

पवार लागले कामाला २१ मे ला भाजप आघाडीतेर पक्षांची दिल्लीत बैठक

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा एकदा संधी मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी २१ मे रोजी देशातील रालोआचे घटक पक्ष नसलेल्या आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांची दिल्लीत बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. …

Read More »

राज्यातील गंभीर परिस्थितीवर चर्चा करायचीय, मुख्यमंत्री महोदय वेळ द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे असे सांगत दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका …

Read More »

निवडणूक आयोग मोदींच्या दावणीला बांधलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी लोकशाहीवरचा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.परंतु देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट संदर्भातील याचिका फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हीव्हीपॅट व निवडणूक मशीन यात तफावत होण्याची …

Read More »

व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी रस्त्यावर उतरा आ. जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन

ठाणे : प्रतिनिधी व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात सुमारे २१ राजकिय पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी व्हावी, यासाठी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी …

Read More »

स्ट्रॉंगरुममध्ये जँमर बसवा आणि उमेदवारांना प्रवेश देवू नका काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आयोगाकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्रॉंगरुममध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येवू नये अशी मागणी करत स्ट्रॉंग रूममध्ये जाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे आक्षेप घेतला. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्ट्राँग रूममध्ये जँमर बसविण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील मतदानाच्या सर्व टप्प्यामध्ये यशस्वी …

Read More »

दुष्काळामुळे शेतकऱ्यांकडची वसूली थांबवा आणि नव्याने कर्ज द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी पुर्वीचे सरकार चारा छावण्यात शेतकर्‍यांची सरसकट जनावरे घ्यायचे. मात्र आज शेतकर्‍यांचे फक्त पाच जनावरे घेण्याचे बंधन आहे. तसेच प्रत्येक जनावरामागे फक्त ९० रुपये खर्च केले जातात. सध्या राज्यातील चारा छावण्यात अपुरा कडबा दिला जातोय. त्यासोबत ऊसाचे वाढे खायला दिल्याने जनावरांची जीभ कापली जाते. यासोबतच सरकारने सर्व प्रकारच्या वसुली तात्काळ …

Read More »

वंचित आघाडी कोणाला वंचित करणार ? आघाडीबरोबरच युतीलाही घोर

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात चार टप्प्यात मतदान झाले. मात्र या चारही टप्प्यात वंचित आघाडीच्या झंझावाती प्रचारसभेला मिळालेला प्रतिसाद आणि जनमानसांचा कल झुकल्याने प्रस्थापित भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित करणार की वंचित स्थापित होणार यावरून जनमानसांबरोबरच राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीने आपले उमेदवार …

Read More »

नरेंद्र मोदी जुन्याच आश्वासनांवर निवडणूक लढवतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची टीका

पुणे – तळेगाव दाभाडेः प्रतिनिधी गेली ५ वर्षे नरेंद्र मोदींचं राज्य आपण बघितलं, मोदींनी सांगितले होते उद्योगधंदा वाढवेन… रोजगार देईन…अनेक आश्वासन त्यांनी दिली. लोकांनी याच आधारावर भाजपला बहुमत दिले. बहुमत असेल तर कोणतेही निर्णय घेता येतात. त्यामुळे मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होईल असे वाटले होते. परंतु ही निवडणुकही भाजपला …

Read More »

राज ठाकरे आणि शरद पवार यांचे स्क्रिप्ट सेम टु सेम शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करीत आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नसल्याची टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. शरद व पवार व राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या …

Read More »