Tag Archives: ncp

मुख्यमंत्र्याना पाहताच विरोधक म्हणतात आले रे आले चोरटे आले विधासभेत आणि पायऱ्यावर विरोधक आणि मुख्यमंत्री यांच्यात पहिल्याच दिवशी सामना

मुंबईः प्रतिनिधी आले रे आले चोरटे आले असं म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि मुख्यमंत्री असा सामना पाहण्यास मिळाला. गेली साडेचार वर्षे जे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी बाकांवर बसले होते ते आता भाजपा सरकारचे मंत्री म्हणून समोर आले. कारण त्यांनी भाजपात प्रवेश केला …

Read More »

सरकारच्या चहापानावर बहिष्कार; विरोधी पक्षांचा निर्णय फडणवीस सरकार म्हणजे 'आभासी' सरकार - धनंजय मुंडे

मुंबईः प्रतिनिधी या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार असल्याचा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. १७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या …

Read More »

भाजपाची बी-टीम आहे की नाही हे काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगावे वंचित आघाडी प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र आता त्यांच्याकडून आघाडीत समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यात येत आहेत. परंतु आम्ही भाजपची बी टीम आहोत का याचे स्पष्टीकरण सर्वात आधी कॉग्रेस-राष्ट्रवादीने करावे असा सवाल वंचित आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. भारिप-बहुजन संघाच्या कार्यालयात आयोजित …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात, चव्हाणांसह काँग्रेसच्या आमदारांनो भाजपात या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना रोज सतत फोन करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. इतकंच नाही तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्नही मुख्यमंत्री आणि भाजपातले इतर नेते करत असून राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अशोक …

Read More »

जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे, त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आमदारपदाच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता नवाब मलिक यांनी वरील आरोप केला. ९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली. त्यावेळी राधाकृष्ण विखे …

Read More »

१६% आणि १०% आरक्षण हे वेगवेगळे विषय मेजर जनरल सिन्हो यांचा अहवाल महत्वाचा ठरेल

औरंगाबाद: जगदीश कस्तुरे केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गांना दिलेले दहा टक्के आरक्षण यंदा लागू करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील खुल्या प्रवर्गाची प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. राज्यात यंदा याआधी जी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती ती आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गात दहा …

Read More »

राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षात विलीन करणार हे वृत्त तथ्यहीन प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॉग्रेस पक्षात विलीन होणार या बातम्यांमध्ये तथ्यता नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. गुरुवारी दहा जनपथ येथे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर देशात उलटसुलट बातम्यांचे पेव फुटले …

Read More »

जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टीका

मुंबईः प्रतिनिधी खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत!अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. मराठा आरक्षणाबरोबरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने फडणवीस सरकारला चांगलेच फटकारले असून सरकारच्या या कारभारावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त …

Read More »

विधानसभेलाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची महाआघाडी संयुक्त बैठकीत एकत्रितपणे लढवण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा

मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्यात आली व आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

Read More »

लोकांचा निर्णय राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी आज जो निकाल आलाय त्यापेक्षा आमची अपेक्षा वेगळी होती. मात्र लोकांनी निर्णय दिला तो राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य आहे. महाआघाडीने जो प्रयत्न केला त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार… कार्यकर्त्यांना धन्यवाद… आणि लोकांनी जो निर्णय दिला तो आम्ही स्वीकारतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद …

Read More »