Tag Archives: ncp

पक्षातील कुणी वेगळा निर्णय घेत असेल तर शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गयारामांना शरद पवारांकडून मोकळीक

साताराः प्रतिनिधी पक्षातील कुणी मंडळी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा! असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गयाराम आणि गयारामाच्या तयारीत असलेल्यांना लगावत राजकारणात कधी कधी असा प्रसंग येतो, त्याचा सामना करायचा मला अनुभव आहे. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते …

Read More »

अखेर राजे, पिचड, नाईक आणि कोळंबकर भाजपात मुख्यमंत्री फडणवीस, अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेवून स्वतःचे राजकिय भवितव्य टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह नवी मुंबईतील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »

राष्ट्रवादीचे राजे, पिचड, नाईक आणि काँग्रेसच्या कोळंबकरांचे राजीनामे भाजप प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समजूत काढूनही सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा दिला. त्याच्यासोबत राष्ट्रवादीचे वैभव पिचड, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केले. विशेष म्हणजे यापैकी वैभव पिचड, संदीप नाईक आणि …

Read More »

भाजप राष्ट्रवादी नेत्यांच्या पाठी लागलीय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागली आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. आमचे नेते खेचण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. सरकारी यंत्रणांची मदत घेतली जात आहे असा आरोप करतानाच भाजपने दुसरा पक्ष फोडण्यापेक्षा काम केले असते तर जनतेचा आशिर्वाद मिळाला …

Read More »

हसन मुश्रीम यांच्या घरावरील छाप्याचा राष्ट्रवादीकडून निषेध राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयावर आणि पुणे येथील त्यांच्या मुलांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यामुळे सरकारकडून आमदार हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सच्चा नेत्याला भय दाखवायचे काम होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या, सरकारी निवेदनाला बगल देणाऱ्या तसेच …

Read More »

निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांचा सेनेत प्रवेश आम्ही मुंबईत शिवसेनेच्या तीन जागा कमी करण्याची राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु शिवसेनेने पडणारा नेता नेला आम्ही शिवसेनेच्या तीन जागा कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष …

Read More »

आणि राष्ट्रवादीचे घड्याळ उलटे फिरू लागले उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात पाच वर्षापूर्वी शिवसेना, भाजपानंतर काँग्रेसमधील नाराज नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकिय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या त्यात शिवसेनेतील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आसरा शोधला. परंतु आगामी विधानसभेच्या निवडणूका लक्षात घेवून आपले राजकिय अस्तित्व राखण्यासाठी राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्यापाठोपाठ मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत …

Read More »

एमएमआरडीएच्या हद्दीत आता पालघर ते रायगड पर्यंत वाढ अधिसूचनेच्या ठरावास विधानसभेची मान्यता

मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर, रायगड, वसई, पेण, खालपूर, अलिबागच्या उर्वरीत भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी या सर्व भागांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याविषयीचा अधिसूचना प्रस्तावाचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला असता त्यास भाजप सदस्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुधारणा सुचवित …

Read More »

पुलवामा, बालाकोट हल्ल्यातील शहीदांना आदरांजली पण त्यांचे प्रश्न तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी जनता व्यक्ती म्हणून कुणाच्या हाती सरकार दिले पाहिजे याचा विचार करते. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मानवंदना वाहिली. मात्र महाराष्ट्रातील शहीदांचे त्यांच्या कुटुबीयांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला …

Read More »

अर्थसंकल्प फुटीची सर्वकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याऐवजी तो बाहेर अगोदरच फुटलेला होता त्यामुळे या प्रकरणाची सर्वकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला परंतु त्याची माहिती अगोदरच बाहेर पडली. ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्यावर …

Read More »