Tag Archives: ram shinde

पंकजा मुंडेंना डावलत भाजपाकडून फडणवीसांच्या मर्जीतील “या” पाच जणांना संधी चार नवे तर एक जूना असे मिळून पाच जणांची यादी जाहिर

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहिर झाल्यानंतर भाजपाकडून सर्वप्रथम भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून सध्या बाजूला फेकल्या गेलेल्या पंकजा मुंडे यानिमित्ताने पुन्हा सक्रिय होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच पुन्हा त्यांचे तिकिट कापण्यात आले. तर त्यांच्या ऐवजी नवोदित भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा …

Read More »

चंद्रकांत पाटील यांनी केला दिल्ली दौऱ्याचा खुलासा म्हणाले… प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी उपयुक्त

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षाच्या पूर्वनियोजित योजनेनुसार आपल्या नेतृत्वाखाली तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले व त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय संघटनमंत्री संतोष यांच्यासह भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील संघटनात्मक कार्य आणि विकासकामांच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत उपयुक्त ठऱला. तथापि, पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याची …

Read More »

विखे- शिंदेंमधील धुसफुस भाजपाच्या कोअर कमिटीत लवकरच अधिकृत कारवाई करणार

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत कर्जत-जामखेडसह अहमदनगरमधील अनेक मतदारसंघात भाजपा उमेदवारांच्या विरोधात विखे-पाटील पितापुत्रांनी काम केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता. तसेच या पिता-पुत्र आणि शिंदे यांच्यातील धुसफुस वाढल्याने अखेर या धुसफुसीवर तोडगा काढण्यासाठी भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणीक, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेत यावर तोडगा …

Read More »

मंत्री राम शिंदें पक्षश्रेष्ठींना म्हणाले विखे-पाटीलांना मंत्री करू नका सरकार स्थापन होण्यापूर्वीच भाजपातर्गंत वातावरण तापले

मुंबईः खंडूराज गायकवाड भाजपला सत्ता स्थापन करायला एकीकडे अद्याप मुहूर्त मिळत नसताना दुसरीकडे मात्र पक्षांतर्गत बंडाळीमुळे सध्या भाजपातर्गंत राजकारण जोरदार तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यावर आपल्याशिवाय कोणाची पकड निर्माण होवू नये यासाठी भाजपाचे पराभूत मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे- पाटील यांनाच मंत्रिमंडळात घेवू नये अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करत त्यासाठी जोरदार …

Read More »

भाजपा-सेनेचे मंत्री पराभूत मुंडे, भेगडे, शिवतारे, शिंदे, खोतकर,बोंडे, फुके यांचा पराभव

मुंबईः प्रतिनिधी अब की बार २२० पारचा नारा देत भाजपा-शिवसेनेने निवडणूकीची घोषणा होण्याआधीच प्रचारात आघाडी घेतली. तसेच मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी महाजनादेश, जनआर्शीवाद यात्रा काढल्या. मात्र या यांत्रांचा परिणाम काही राज्यातील जनतेवर झालेला नसून यात भाजपा-शिवसेनेचे ५ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसून येत आहे. राज्य …

Read More »

पंकजा मुंडे, राम शिंदे, मेहता पराभवाच्या छायेत धनंजय मुंडे, राम शिंदे, गीता जैन यांचा विजय निश्चित

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणीची सुरु आहे. या मतमोजणीत परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे १२ हजारहून अधिक, तर कर्जत-जामखेडमधून रोहीत पवार हे १३ हजारहून अधिक आणि मीरा-भाईंदरमधून अपक्ष उमेदवार गीता जैन या १२ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपाचे पंकजा मुंडे, राम शिंदे, नरेंद्र मेहता …

Read More »

‘भाजपाचा राम’ शिल्लक राहिला नाही अशी वर्तमानपत्रांची हेडलाईन असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे भाकित

कर्जत जामखेडः प्रतिनिधी कर्जत- जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही ही हेडलाईन २४ तारीखला वर्तमानपत्रांची असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कर्जतच्या जाहीर सभेत व्यक्त केला. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पार पडली. त्यावेळी ते बोलत …

Read More »

दोन वर्षांत कोणीही बेघर राहणार नाही महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

अहमदनगरः प्रतिनिधी महाराष्ट्रात बेघर असलेल्या सर्वांना घरे देण्याचे काम वेगाने चालू असून २०२१ पर्यंत राज्यातील कोणीही बेघर असणार नाही, प्रत्येक गरीबाला रहायला घर मिळेल, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात अकोले येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ …

Read More »

अनुसूचित जमातीसाठीच्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजासाठीही नव्या १३ योजना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची मंत्री डॉ. संजय कुटे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सारथीच्या धर्तीवर ‘महाज्योती’ महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असून ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन महत्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवून अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण १३ योजना सुरु करणार असल्याचे कामगार, इमाव, …

Read More »

दुसऱ्याला विचारून काम करणाऱ्या मंत्र्याने अपयशी कारभाराचा विचार करावा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची उपरोधिक टीका मुंबई : प्रतिनिधी आपल्या विभागात काय काम करायचे? हे ही दुस-या मंत्र्यांना विचारणा-या मंत्र्यांने कर्नाटक सरकारच्या भवितव्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या अपयशी कारभाराचा व त्यामुळे महाराष्ट्राच्या झालेल्या नुकसानीचा विचार करावा असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जलसंधारण मंत्री राम …

Read More »