राज्यातील पेसा क्षेत्रातील कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरून कृषी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात पेसा अंतर्गत कृषी सेवक पदभरती, रिक्त जागा भरणे आणि मानधन तत्वावरील कृषी सेवकांच्या नियमितीकरणासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण तोडसाम, कृषी विभागाचे सचिव …
Read More »भरत गोगावले यांचे आवाहन, रोहयो विभागामार्फत भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहा सोशल मिडीयाच्या माध्यमातून भरतीच्या जाहिराती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू असल्याची बोगस जाहिरात सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात येत आहे. अशा जाहिरातींना बळी पडून सर्वसामान्य नागरिक व बेरोजगार युवकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. …
Read More »राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री …
Read More »सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ ९ जानेवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मुदत वाढ
सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मुंबई शहराचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या भरतीसंदर्भातील जाहिरात १२ …
Read More »महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून एकूण २९० पदांची भरती आयबीपीएस मार्फत केली जाणार आहे. यासंदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mjp.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या भरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या …
Read More »पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठी सुधारित जाहिरात ओबीसीसाठी १० टक्के आरक्षण लागू
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -३ या पदासाठी काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील जागा उपलब्ध झाल्याने या पदांसाठी आता सुधारित जाहिरातीनुसार पदभरती होणार आहे. त्यानुसार इच्छुकांना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन …
Read More »एच-१बी व्हिसावरून अमेरिकन सिनेटकडून लक्ष्य नोकर भरती पद्धतीवरून संशय व्यक्त
भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही दोन वरिष्ठ अमेरिकन सिनेटरकडून तिच्या भरती पद्धतींबद्दल चौकशीच्या अधीन आहे. सीईओ के कृतिवासन यांना लिहिलेल्या पत्रात, सिनेट न्यायपालिका समितीचे अध्यक्ष चार्ल्स ग्रासली आणि रँकिंग सदस्य रिचर्ड डर्बिन यांनी अमेरिकन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकताना कंपनी एच-१बी व्हिसा कामगारांवर अवलंबून असल्याबद्दल …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, आता राज्य उत्पादन शुल्क विभागातही ५०ः५० प्रमाणे पदोन्नती दुय्यम निरिक्षक पदासाठी भरती प्रक्रियेत बदल
राज्य उत्पादन शुल्क विभागातील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा दुय्यम निरिक्षक (गट -क) पदासाठी सध्या सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करत दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानांमधून केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज …
Read More »राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे स्पष्टीकरण, युपीएससीची जाहिरात मागे नोकर भरती प्रक्रिया रद्द केल्यानंतर युपीएससी जाहिरातही मागे घेतली
केंद्र सरकारने विविध मंत्रालयांमधील रिक्त पदांच्या नोकऱ्यांसाठीची भरती प्रक्रिया रद्द केल्यानंतर दहा महिन्यांनी, आरक्षण समाविष्ट करण्याच्या धोरणाचा आढावा घेणार असल्याचे सांगून, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितले की, सरकारने त्यांचे पार्श्व प्रवेश धोरण स्थगित केलेले नाही आणि अजूनही “ते खुले आहे”. १७ ऑगस्ट २०२४ …
Read More »विधि व न्याय विभागात टंकलेखकांच्या ५ हजार २२३ नवीन पदांची निर्मिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी
राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार ५ हजार २२३ टंकलेखकाची एकाकी पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) या संवर्गातील अधिकाऱ्यांची नवीन २ हजार ८६३ नियमित पदे निर्माण करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya