Tag Archives: Satej bunty patil

मिनाक्षी नटराजन यांचा आरोप, वोटचोरी, सीटचोरी, पक्ष चोरीनंतर आता नागरिकता चोरीचे देशासमोर मोठे संकट मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करणे हा लोकशाहीवरच मोठा अन्याय, आता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज: हर्षवर्धन सपकाळ

देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागले आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क …

Read More »

टीईटीच्या पेपरफुटीवरून विधानसभा आणि विधान परिषदेत गोंधळ चर्चेसाठी विधान परिषदेत विधानसभेत विरोधक आग्रही

एकामागून एक पेपरफुटीच्या  घटना राज्यात होत असताना २८ जूनला होणाऱ्या टीईटीच्या परीक्षेला पेपर २७ जूनलाच फुटल्याने त्या परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षक होऊ पाहणाऱ्यांचे अनेकांचे स्वप्न भंगले असल्या कारणाने विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला ठेऊन स्थगन प्रस्ताव मांडत सर्व कामकाज बाजूला सारत याप्रश्नी चर्चा करावी अशी मागणी विधानसभेत शिवसेना …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम पूर्ण

सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये, यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ आकारण्यात आला आहे. हे शुल्क  केवळ ०.१३ टक्के ग्राहकांवर लागू होते. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील …

Read More »

काँग्रेसची हाक, कोल्हापुरकरांनो मराठवाड्याला साथ देऊया.. आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. त्यामुळे संकटग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सतेज बंटी पाटील यांनी कोल्हापूरकरांना केले. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत भाजपाने मतचोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले, मतचोरांना आता जनताच शिक्षा देणार: विजय वडेट्टीवार.

भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात झाला. ज्या कामठीत मतचोरीची सुरवात झाली त्या चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे. वोट चोर, गद्दी छोड,चा पहिला धमाका कामठीत झाला असून तो देशभर पाहोचला आहे. आता या मतचोरांना …

Read More »

सतेज बंटी पाटील यांचा आरोप नवीन ट्रॅक्टर नियम शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अधिसूचनेत ट्रॅक्टरसाठी जीपीएस ब्लॅक बॉक्ससारखी उपकरणे सक्तीने बसवण्याची तरतूद आहे. ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा असल्याचा आरोप काँग्रेसचे विधनपरिषदेतील गटनेते आमदार सतेज …

Read More »

आमदार सतेज बंटी पाटील यांचा सवाल, नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी? सरकारने काही सूचना केल्या आहेत का ?

प्राधिकरणाच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जात आहे ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. आपला जुन्या व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे काय? या प्राधिकरणांना काही नविन अधिकार दिले आहेत का ? असा प्रश्नांचा भडीमारही आमदार …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, … नवा अवतार राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला परभणीतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्या सोमवारी संविधान बचाव यात्रा

भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि …

Read More »

शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार: मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार

आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच असा निर्धार १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला. प्रत्येक …

Read More »

अंबादास दानवे यांची ग्वाही, शक्तीपीठ महामार्ग ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ विरोधी मोर्चाला समोर बोलताना दिली ग्वाही

शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असल्याची ग्वाही विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली. मुंबई येथील आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित धडक मोर्चास आज उपस्थित राहून संबोधित केले. यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापुर येथील …

Read More »