Tag Archives: shivsena (UBT)

अनिल परब यांचा आरोप, बीएमसीच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत ९० कोटींचा घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीकडून चौकशी सुरू असतानाही घोटाळा

बीएमसीमधील उघड भ्रष्टाचाराच्या आणखी एक उदाहरण समोर आले असून त्यात बीएमसीने प्रतिबंधात्मक पद्धती आणि निवडक अटी वापरून मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत फेरफार केल्यामुळे बीएमसीचे ९० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, त्याचबरोबर एसआयटीकडून चौकशी सुरु असताना हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे विधान परिषदेतील गटनेते अनिल परब यांनी आज …

Read More »

सुषमा अंधारे म्हणाल्या, उज्वल निकम यांची नियुक्ती …. सत्यता नीट जाणून घ्या देशमुख हत्या प्रकरणी उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर सुषमा अंधारे यांची टीका

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्याआधी कृपया सत्यता नीट समजून घ्या असे आवाहन शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमांवर एका पोस्टच्या माध्यमातून केले. त्यासाठी सुषमा अंधारे यांनी खैरलांजी प्रकरण, अजमल कसाब प्रकरणाचा दाखला देत …

Read More »

सुषमा आंधारे यांचा इशारा, नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल नीलम गोऱ्हे यांनी आतापर्यंत ज्या पक्षात प्रवेश केला तेथे कोणतेच काम केले नाही

एकेकाळच्या शिवसेना पक्षाच्या महिला उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्या आरोपावरून नीलम गोऱ्हे यांच्यावर आज सकाळपासून टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. त्यातच सुषमा आंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा आज …

Read More »

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती, न्यायालयाच्या निकालाची प्रत मला मिळाली नाही मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयाची प्रत मिळाल्यानंतरच कारवाई

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच ५० हजार रूपयांचा दंडही ठोठावला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी आणि आमदाराकीवर निर्णय केव्हा अशी विचारणा विरोधकांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून …

Read More »

हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदे यांचा इशारा नेमका कोणासाठी फडणवीस की ठाकरे एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिलेल्या प्रकल्पांना स्थगिती आणि चौकशी

राज्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढत्या दरीच्या कथित चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना हलके न घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना टाळाटाळ करणारे एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाचा संदर्भ देत …

Read More »

भास्कर जाधव यांची नाराजी, क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही राजकारणातील सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरील भाषणाने

विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात शिवसेना उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या भागातील नेत्यांना आणि पराभूत आमदारांना लक्ष करण्याचा सपाटा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने सुरु केला आहे. त्यात कोकणातील पहिला मोहरा म्हणून राजन साळवी यांना पक्षात घेतले. राजन साळवी यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने कोकणातील शिवसेना उबाठाला धक्का बसला असल्याचे बोलले जात असतानाच ज्या …

Read More »

संजय राऊत यांची टीका, बीडच्या लोकांनी … दुर्दैवाने खरं होताना दिसतय धनंजय मुंडे, सुरेश धस, वाल्मिक कराड यांच्या संबधावरून केली टीका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यास अटक केल्यानंतर आणि वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचे संबध उघडकीस आले. त्यातच सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून सातत्याने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले. मात्र दोनच दिवसांपूर्वी भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर, उद्धव ठाकरे अजित पवार यांना भेटले, आम्ही आक्षेप… शरद पवार यांच्यावरील संजय राऊत यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर

दिल्लीतील एका कार्यक्रमात महादजी शिंदे पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान केला. त्यावरून शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला. त्यातच संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी तर शरद पवार यांच्यावर विश्वासघातकी म्हणून टीका केली. त्या टीकेला राष्ट्रवादी …

Read More »

दिल्ली निकालावर बोलता संजय राऊत म्हणाले, अण्णा हजारे आणि काँग्रेसला…. आम आदमी पार्टीच्या पराभवावर व्यक्त केले दुःख

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत नेमका कोणता पक्ष विजयी होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच महाराष्ट्रातील निवणूक निकालाची पुर्नरावृत्ती किमान दिल्लीत तरी होणार नाही अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत होती. मात्र दिल्लीत भाजपाला ४६ विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला, तर आम आदमी पार्टीला २२ ठिकाणी विजय मिळाला. …

Read More »

सुप्रिया सुळे यांची मागणी, बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे यांनी केली मागणी

मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्ही मतदार यादी मागत आहोत त्या द्या. महाराष्ट्रामध्ये अचानक मतदारांची संख्या अचानक वाढली कशी असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. दिल्लीत लोकसभेचे विरोधी …

Read More »